Railway Ticket Booking : तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार? भारतीय रेल्वेने दिली माहिती

  79

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण गावी फिरायला जातात. मात्र अनेकांना आरक्षण मिळत नसल्याने काहीजण तत्काळ तिकीट (Tatkal Ticket Booking) बुकींग करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असून याबाबत भारतीय रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे.



भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तत्काळ तिकीट बुकिंगबाबत निवेदन जारी केले आहे. एसी आणि नॉन-एसी क्लासेस याबरोबरच एजंट यांच्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सर्वा पोस्ट खोट्या असल्याचे समजते. 'सोशल मीडिया चॅनेल्सवर काही पोस्ट फिरत आहेत ज्यात तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठीच्या वेगवेगळ्या वेळेबद्दल उल्लेख आहे. एसी किंवा नॉन-एसी क्लासेससाठी तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळेत सध्या अशा प्रकारचा कोणताही बदल प्रस्तावित नाहीत. एजंटसाठी मंजूर करण्यात आलेल्या बुकिंग वेळेतही कोणताही बदल नाही,” असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. (Railway Ticket Booking)



सध्याच्या वेळा काय आहेत?


रेल्वेचे तात्काळ ई-तिकीट हे एक दिवस आधी बुक करता येते, ज्यामध्ये प्रवास सुरू होण्याची तारीख वगळली जाते. ओपनिंगच्या दिवशी एसी क्लाससाठी (२ए/३ए/सीसी/ईसी/३ई) भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी (एसएल/एफसी/२एस) भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११ वाजता हे तिकीट बुक करता येते. विशेष म्हणजे, फर्स्ट एसी सोडून सर्व क्लासमध्ये तत्काळ बुकिंग करता येते. (Railway Ticket Booking)



तात्काळ तिकीटासाठी किती पैसे जास्त द्यावे लागतात?


तात्काळ तिकीटासाठी प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटावर सामान्य तिकिटाव्यतिरिक्त काही ठराविक शुल्क आकारले जाते. किमान आणि कमाल शुक्लाच्या आत सेकंड क्लाससाठी मूळ भाड्याच्या १० टक्के आणि इतर सर्व क्लासेससाठी मूळ भाड्याच्या ३० टक्के दराने हे शुल्क निश्चित केलेले आहे. कन्फर्म झालेले तात्काळ तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला कोणताही रिफंड दिला जात नाही. आचानक रद्द केल्यास आणि वेटिंग लिस्टमधील तत्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमांनुसार शुल्क कापले जाते. (Tatkal Ticket)

Comments
Add Comment

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला

रुग्णालयातील स्वच्छतेवर चक्क नऊ कोटी खर्च; मनपाचा वैद्यकीय विभाग ठेकेदारांवर मेहेरबान?

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पाच रुग्णालयांमध्ये साफसफाईच्या कामांसाठी तब्बल नऊ कोटींचा खर्च

वीज ग्राहकांना सरसकट दिलासा; घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीजदरात कपात

मुंबई/नाशिक : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र

मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या

ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या

पिंपरी महापालिकेत डी आर सी घोटाळा उघड

पिंपरी : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता दिनेश फाटक आणि कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड यांनी