Tanker Price Hike : वाढत्या उन्हात दरवाढीचा चटका! टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ

  44

पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात उन्हाच्या झळा (Summer Heat) वाढत चालल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात अनेक शहरांसह गावांमध्ये पाण्याची कमतरता (Water Shortage) भासत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी (Water Tanker) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र टँकरची मागणी वाढत असतानाच महापालिकेने टँकरच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उन्हात दरवाढीचा चटका बसत असल्याचे दिसत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ८७ हजार ८८८ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी ३८ हजार २९९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्यात ९ हजार ५९७ टँकरची भर पडून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.


यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत.



काय आहेत टँकरचे दर?



  • दहा हजार लिटरपर्यंत : जुना दर ६६६ रुपये - नवीन दर ६९९ रुपये

  • दहा हजार ते पंधरा हजार लिटरपर्यंत : जुना दर १०४८ रुपये - नवीन दर ११०१ रुपये

  • पंधरा हजार लिटरपेक्षा जास्त : जुना दर १४७८ रुपये - नवीन दर १५५२ रुपये

  • महापालिकेचा टँकर असल्यास (नागरिकांसाठी) दहा हजार लिटरपर्यंत : जुना दर ११८२ रुपये - नवीन दर १२४१ रुपये

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या