DC vs MI, IPL 2025: मुंबईला जिंकण्याची संधी!!!

  107

मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचा संघ दिवसेंदिवस रसातळला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच पैकी फक्त एकच सामना मुंबईने जिंकला आहे. मुंबईला ह्या हंगामात ना धावांचा पाठलाग करता येत आहे ना पहिली फलंदाजी घेऊन चांगली धावसंख्या उभारता येत आहे. मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करताना थोडा कमी पडत आहे. मागील दोन्ही सामने त्यांनी फक्त १२ धावांनी गमावले आहेत. त्यांची सलामीची जोडी संघासाठी भक्कम सुरवात करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोहितला थोडे संयमाने खेळावे लागेल, आज मुंबई संघाला त्याच्या संयमी खेळाची गरज आहे.


मुंबईला गोलंदाजीवरही लक्ष द्यावे लागणार आहे. आज त्यांच्या समोर ह्या हंगामातील सर्वोत्तम संघ खेळणार आहे त्यामुळे मुंबईला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईसाठी डोकेदुखी असेल ते मिचेल स्टार्कचा सुरवातीचा स्पेल, तो त्यांना संयमाने खेळून काढावा लागेल, अथवा त्याला आक्रमकपणे उत्तर द्यावे लागेल.


मुंबईकडे आक्रमकपणा आहे पण तो ह्या हंगामात अजूनही दिसून आलेला नाही. कदाचित ह्याला कर्णधार जबाबदार असू शकतो. मुंबईकडे जमेची बाजू म्हणजे बुमराहचे आगमन, बुमराह आज संघासाठी संजीवनी बुटीचे काम करू शकतो. तस झाल तर मुंबईच्या संघात एक चैतन्य निर्माण होईल. दिल्लीसाठी बुमराहचा स्पेल खेळणे कठीणच आहे.


मुंबईचा आज पर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा अशक्य असते तेव्हाच कठीण परिस्थितीत खेळून ते शक्य करून दाखवतात. आज असच काहीतरी होईल अशी अपेक्षा.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र