DC vs MI, IPL 2025: मुंबईला जिंकण्याची संधी!!!

मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचा संघ दिवसेंदिवस रसातळला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच पैकी फक्त एकच सामना मुंबईने जिंकला आहे. मुंबईला ह्या हंगामात ना धावांचा पाठलाग करता येत आहे ना पहिली फलंदाजी घेऊन चांगली धावसंख्या उभारता येत आहे. मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करताना थोडा कमी पडत आहे. मागील दोन्ही सामने त्यांनी फक्त १२ धावांनी गमावले आहेत. त्यांची सलामीची जोडी संघासाठी भक्कम सुरवात करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोहितला थोडे संयमाने खेळावे लागेल, आज मुंबई संघाला त्याच्या संयमी खेळाची गरज आहे.


मुंबईला गोलंदाजीवरही लक्ष द्यावे लागणार आहे. आज त्यांच्या समोर ह्या हंगामातील सर्वोत्तम संघ खेळणार आहे त्यामुळे मुंबईला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईसाठी डोकेदुखी असेल ते मिचेल स्टार्कचा सुरवातीचा स्पेल, तो त्यांना संयमाने खेळून काढावा लागेल, अथवा त्याला आक्रमकपणे उत्तर द्यावे लागेल.


मुंबईकडे आक्रमकपणा आहे पण तो ह्या हंगामात अजूनही दिसून आलेला नाही. कदाचित ह्याला कर्णधार जबाबदार असू शकतो. मुंबईकडे जमेची बाजू म्हणजे बुमराहचे आगमन, बुमराह आज संघासाठी संजीवनी बुटीचे काम करू शकतो. तस झाल तर मुंबईच्या संघात एक चैतन्य निर्माण होईल. दिल्लीसाठी बुमराहचा स्पेल खेळणे कठीणच आहे.


मुंबईचा आज पर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा अशक्य असते तेव्हाच कठीण परिस्थितीत खेळून ते शक्य करून दाखवतात. आज असच काहीतरी होईल अशी अपेक्षा.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.