Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर भीषण अपघात! एक ठार, ९ जखमी

अमरावती : आष्टगाव ते खानापूर मार्गावर भीषण अपघात (Accident News) झाल्याचे समोर आले आहे. मोर्शीच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू बोलोरो पलटी होऊन आज मोठा अपघात घडला आहे. यामध्ये १ जणाचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



एचजी इन्फो स्ट्रक्चरचे १० मध्य प्रदेशातील मजूर चांदूर बाजार येथील एच जी च्या प्लांट वरून मोर्शी कडे घेऊन जात असताना खानापूर ते आष्टगाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू पिकअप क्रमांक एम एच २७ एक्स ८६०१ पलटी होऊन एक मजूर घटनास्थळी ठार झाला तर ९ मजूर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पिकअप खाली दबलेल्या मजुराला मालवाहू पिकअप सरळ करून अन्य ९जखमींना बाहेर काढले. या अपघातात मध्य प्रदेशातील राकेश पाटील वय २२ वर्ष हा घटनास्थळी ठार झाला. (Accident News)



जखमींची माहिती


पप्पू काजदे (२०), राजा काजळे यांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी अमरावती रवाना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्य जखमींची नावे मुजा कासदे, सुनील कासदे, रंगभाऊ श्रीपाद यादव, सालक राम सालवे, लालसिंग कासदे, अर्जुन चिराले ही सर्व जखमींची नावे आहेत. गंभीर जखमींवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सचिन कोरडे यांनी उपचार केले. वृत्तलिहे पर्यंत पोलिसात तक्रारीची नोंद नाही. अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून