Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर भीषण अपघात! एक ठार, ९ जखमी

  44

अमरावती : आष्टगाव ते खानापूर मार्गावर भीषण अपघात (Accident News) झाल्याचे समोर आले आहे. मोर्शीच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू बोलोरो पलटी होऊन आज मोठा अपघात घडला आहे. यामध्ये १ जणाचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



एचजी इन्फो स्ट्रक्चरचे १० मध्य प्रदेशातील मजूर चांदूर बाजार येथील एच जी च्या प्लांट वरून मोर्शी कडे घेऊन जात असताना खानापूर ते आष्टगाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू पिकअप क्रमांक एम एच २७ एक्स ८६०१ पलटी होऊन एक मजूर घटनास्थळी ठार झाला तर ९ मजूर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पिकअप खाली दबलेल्या मजुराला मालवाहू पिकअप सरळ करून अन्य ९जखमींना बाहेर काढले. या अपघातात मध्य प्रदेशातील राकेश पाटील वय २२ वर्ष हा घटनास्थळी ठार झाला. (Accident News)



जखमींची माहिती


पप्पू काजदे (२०), राजा काजळे यांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी अमरावती रवाना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्य जखमींची नावे मुजा कासदे, सुनील कासदे, रंगभाऊ श्रीपाद यादव, सालक राम सालवे, लालसिंग कासदे, अर्जुन चिराले ही सर्व जखमींची नावे आहेत. गंभीर जखमींवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सचिन कोरडे यांनी उपचार केले. वृत्तलिहे पर्यंत पोलिसात तक्रारीची नोंद नाही. अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला