पुण्यातल्या भेटीत दडलंय काय? अमित शाह, फडणवीस, शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यातून रायगडकडे रवाना होण्यापूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


रायगड दौऱ्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री पुण्यात आले. येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. भेटीत काय चर्चा झाली याची ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.



पालकमंत्रिपदावरून तिढा कायम


रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. मात्र येथे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे. अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. अमित शाह यांच्या आजच्या दौऱ्यात दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत आहे.



शाह यांच्या हस्तक्षेपाने तोडगा निघणार?


महायुती सरकार स्थापन होऊन चार ते पाच महिने उलटले तरी या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे शाह यांच्या हस्तक्षेपाने अखेर यावर तोडगा निघेल, अशी आशा आहे. आजच्या दौऱ्यात याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, रायगड दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शाह यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात