मुंबई लोकल नाशिकपर्यंत लवकरच धावणार

मुंबई - मुंबई ते नाशिक दरम्यान हजारो प्रवासी नियमित प्रवास करतात. या प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेससारख्या काही गाड्या आहेत. मात्र नाशिकपर्यंत थेट लोकल सुरू होण्यासाठी कसारा घाटाची अडचण होती. आता ही अडचण दूर होणार असल्याने मुंबई ते नाशिक लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याने मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे.



नवीन रेल्वे लाईनमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच नाशिक आणि मुंबई ही दोन शहरे लोकल सेवेने जोडली जाणार आहेत. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याने मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे.



नाशिक ते मुंबई दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढवला जाईल. त्यामुळे वेगाने प्रवास होणार आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण