Nashik Crime : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी केला आर्थिक घोटाळा, CBI ची कारवाई

नाशिक : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकाने पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. सीबीआय या प्रकरणी व्हॉटसॲप चॅट आणि आर्थिक व्यवहार यांच्यातील कनेक्शन तपासून कायदेशीर कारवाई करत आहे. नाशिक येथील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन आणि ओझर येथील लष्करी जवानांच्या वेतनासह विविध भत्त्यांसंदर्भातील देयके देण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयासह संलग्न कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासातून समोर आले आहे. संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालय, ओआरएस, एएसी या यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला आहे.



आतापर्यंतच्या तपासातून हाती आलेल्या माहितीआधारे नाशिकच्या आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या (एएसी) वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखापरीक्षक नवीन कुमार मिणा, अजय कुमार, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अनुप कुमार उर्फ अनुप पटेल, अश्विनी कुमार पांडेय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकच्या ओझर येथील ‘एओजीई’ कार्यालयातील लेखापरीक्षक विकास कुमार मीना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील (ओआरएस) लेखापरीक्षक मोहित स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन गुन्ह्यांमध्ये पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १७३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ज्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांच्या घराची तसेच त्यांच्या मालमत्तांची आणि बँक खात्यांची तपासणी सुरू आहे. कागदपत्रांच्या छाननीची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरातील प्रसिद्ध रुग्णालयात डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू; इंजेक्शन ओव्हरडोजचा संशय

Nagpur News : नागपुर: नागपुरातील धंतोली परिसरातील न्यूरॉन रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू

Father Attacks Son : रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलगा आणि सुनेवर जीवघेणा हल्ला

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या