बदलापूरहून नवी मुंबईचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांवर!

मुंबई : मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन – कासगाव’ अशी घोषणा ऐकू येणार आहे. बदलापूरकरांसाठी नवी मुंबई गाठण्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे बदलापूर आणि नवी मुंबईमधील अंतर केवळ ३० मिनिटांवर येणार आहे. यामुळे नवी मुंबईला ये-जा करण्यासाठी बदलापूरवासीयांची आता दमछाक होणार नाही.



सध्या बदलापूर शहरातून तसेच मध्य रेल्वेवरून दररोज हजारो नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईला प्रवास करतात. जर त्यांना रेल्वेने प्रवास करायचा असल्यास त्यांना ठाण्यावरून लोकल बदलावी लागते. तसेच रस्ते मार्गाने नवी मुंबई गाठण्यासाठी एनएमएमटीच्या बस उपलब्ध आहेत. मात्र शिळफाटा आणि तळोजा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाला दीड तासांपर्यंतचा वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या समस्येवर मात करण्यासाठी कासगाव-मोरबे-मानसरोवर या नवीन रेल्वेमार्गाची योजना आखण्यात आली आहे. हा मार्ग सुरू झाल्यास बदलापूरमधील प्रवाशांना नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६