Devendra Fadnavis : 'छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…'

  60

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.





छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशन करावे अशीही मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.



खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने मागण्या जाहीरपणे केल्या आहेत. पण याआधीच या मागण्यांबाबत राज्य शासन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे. आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. आपल्या देशात अशा गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई होईल. कायद्यात आणखी कठोर तरतुदी करण्याचं आम्ही ठरवलं आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्याचे काम लवकरच हाती घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.



खासदार उदयनराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या

  1. छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करा. महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना जामीन देऊ नये.

  2. राज्य सरकारने शिवरायांचा समग्र इतिहास प्रकाशित करावा. महापुरुषांविषयीच्या कलाकृती प्रसिद्ध होण्याआधी त्यांची सेन्सॉर बोर्डाकडून तपासणी करुन घेण्याचे बंधन असावे आणि त्यासाठी तसे सेन्सॉर बोर्ड करावे.

  3. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक उभारावे

  4. शहाजीराजे भोसले यांच्या समाधीसाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.

  5. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ शिवस्मारक उभारावे

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत