Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवड्यातुन सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे. अलायन्स एअर लाईनच्या संकेत स्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे अशी माहिती आज महाराष्ट्र एअर डेवलपमेंट कंपनी च्या संचालिका स्वाती पांडे व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी विमानतळावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली..


अमरावती विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था,व्यापार,पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम चेंजर ठरणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी उडाण योजनेंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे,तर उद्योग,व्यवसाय आणि प्रवासासाठी सुवर्णद्वार ठरणार आहे असे जिल्हाधिकारी सौरभ यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ आहे.



मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करार


प्रादेशिक संपर्क योजना उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. त्यानुसार आठवड्यातून तीन दिवस अमरावतीकरांना मुंबईने विमानवारी करता येईल, असे वेळापत्रक अलायन्स एअर लाइन्सने जारी केले आहे. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हैंडलिंगची चाचपणी चमूद्वारे झालेली आहे. अलाइन्स एअर लाइनच्या करारानुसार मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा असणार आहे.तर येत्या काळात पुणे,नवी दिल्ली ही विमान सेवा सुरु करण्याची तयारी सुरु ज़ली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या