Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवड्यातुन सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे. अलायन्स एअर लाईनच्या संकेत स्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे अशी माहिती आज महाराष्ट्र एअर डेवलपमेंट कंपनी च्या संचालिका स्वाती पांडे व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी विमानतळावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली..


अमरावती विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था,व्यापार,पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम चेंजर ठरणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी उडाण योजनेंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे,तर उद्योग,व्यवसाय आणि प्रवासासाठी सुवर्णद्वार ठरणार आहे असे जिल्हाधिकारी सौरभ यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ आहे.



मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करार


प्रादेशिक संपर्क योजना उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. त्यानुसार आठवड्यातून तीन दिवस अमरावतीकरांना मुंबईने विमानवारी करता येईल, असे वेळापत्रक अलायन्स एअर लाइन्सने जारी केले आहे. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हैंडलिंगची चाचपणी चमूद्वारे झालेली आहे. अलाइन्स एअर लाइनच्या करारानुसार मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा असणार आहे.तर येत्या काळात पुणे,नवी दिल्ली ही विमान सेवा सुरु करण्याची तयारी सुरु ज़ली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू