Nashik Crime : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी केला आर्थिक घोटाळा, CBI ची कारवाई

नाशिक : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकाने पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. सीबीआय या प्रकरणी व्हॉटसॲप चॅट आणि आर्थिक व्यवहार यांच्यातील कनेक्शन तपासून कायदेशीर कारवाई करत आहे. नाशिक येथील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन आणि ओझर येथील लष्करी जवानांच्या वेतनासह विविध भत्त्यांसंदर्भातील देयके देण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयासह संलग्न कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासातून समोर आले आहे. संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालय, ओआरएस, एएसी या यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला आहे.



आतापर्यंतच्या तपासातून हाती आलेल्या माहितीआधारे नाशिकच्या आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या (एएसी) वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखापरीक्षक नवीन कुमार मिणा, अजय कुमार, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अनुप कुमार उर्फ अनुप पटेल, अश्विनी कुमार पांडेय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकच्या ओझर येथील ‘एओजीई’ कार्यालयातील लेखापरीक्षक विकास कुमार मीना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील (ओआरएस) लेखापरीक्षक मोहित स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन गुन्ह्यांमध्ये पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १७३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ज्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांच्या घराची तसेच त्यांच्या मालमत्तांची आणि बँक खात्यांची तपासणी सुरू आहे. कागदपत्रांच्या छाननीची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद