Nashik Crime : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी केला आर्थिक घोटाळा, CBI ची कारवाई

नाशिक : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकाने पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. सीबीआय या प्रकरणी व्हॉटसॲप चॅट आणि आर्थिक व्यवहार यांच्यातील कनेक्शन तपासून कायदेशीर कारवाई करत आहे. नाशिक येथील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन आणि ओझर येथील लष्करी जवानांच्या वेतनासह विविध भत्त्यांसंदर्भातील देयके देण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयासह संलग्न कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासातून समोर आले आहे. संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालय, ओआरएस, एएसी या यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला आहे.



आतापर्यंतच्या तपासातून हाती आलेल्या माहितीआधारे नाशिकच्या आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या (एएसी) वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखापरीक्षक नवीन कुमार मिणा, अजय कुमार, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अनुप कुमार उर्फ अनुप पटेल, अश्विनी कुमार पांडेय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकच्या ओझर येथील ‘एओजीई’ कार्यालयातील लेखापरीक्षक विकास कुमार मीना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील (ओआरएस) लेखापरीक्षक मोहित स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन गुन्ह्यांमध्ये पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १७३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ज्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांच्या घराची तसेच त्यांच्या मालमत्तांची आणि बँक खात्यांची तपासणी सुरू आहे. कागदपत्रांच्या छाननीची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये