पालकांनो लक्ष द्या! सात महिन्याच्या बाळाने गिळली हेअरक्लिप

  53

मालेगाव : मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सात महिन्याच्या बाळाच्या घशामध्ये हेअरक्लिप अडकली. मात्र डॉक्टरांच्या मदतीने बाळाच्या गळ्यात अडकलेली हेअरक्लिप यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली आहे.



मिळलेल्या माहितीनुसार, सात महिन्याचे बाळ घरात नेहमीप्रमाणे खेळत असताना त्याने चुकून शेजारी पडलेली हेअरक्लिप तोंडात घातली. वेळेत कुणाचेही लक्ष न गेल्याने बाळाने ती क्लिप गिळण्याचा प्रयत्न केला आणि क्लिप घशात अडकून पडली. त्याला श्वास घ्यायला अडचण यायला सुरुवात झाली, श्वास अडकला तसे कुटुंबीय घाबरले. बाळाने नक्की काय गिळले आहे कुणालाही सांगता येत नव्हते. मात्र एक्स रे काढल्यानंतर हेअरक्लिप गिळल्याचे लक्षात आले आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

बाळाला तातडीने मालेगाव शहरातील शौर्या इएनटी हॉस्पिटल मध्ये डॉ. शुभांगी अहिरे यांच्याकडे आणण्यात आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून डॉ. अहिरेंनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे ठरवून कुटुंबियांना तशी कल्पना दिली. बाळ खूपच लहान असल्याने अर्थातच शस्त्रक्रियेतली जोखीमही मोठी होती. कुटुंबीयांनी तातडीने संमती दिल्यानंतर ताबडतोब डॉ. अहिरे यांनी बाळाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. अखेर बऱ्याच अथक प्रयत्नांनी नाजूक शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर घशात अडकलेली हेअर क्लिप बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. दरम्यान बाळाचा श्वास पूर्ववत सुरू झाल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या