जिल्ह्याची उत्पादन क्षमता वाढवा, दरडोई उत्पन्न वाढीसाठी साथ द्या

  46

खासदार नारायण राणे यांचे जनतेला आवाहन


कणकवली : वैभववाडी कोल्हापूर हा रेल्वे मार्ग लवकरच सुरू करणार आहोत. आंबा, काजू, कोकम पासून लोणचे,पापडापर्यंत चे सर्व प्रक्रिया उद्योग येथे आणणार आहोत.तसे प्रयत्न आमचे आहेत. जनतेने साथ द्यावी. शेती करा, उपन्न वाढवा त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल. शेवगा, फणस यांचे आयुर्वेदात फार महत्व आहे. त्यावर प्रक्रिया करा. फणसाच्या बियाची पावडर करून डायबिटीस वर औषध बनवले जाते. शेवगा आयुर्वेदिक औषध आहे. गवती चहावर संसार चालतात, कोकणातील प्रत्येक उत्पादनाला महत्व आहे. इथल्याच उत्पादनांवर येथेच प्रक्रिया करा. इथेच मार्केटिंग तुम्ही करून उत्पादने राज्यात देशात आणि परदेशात पाठवा.तेव्हाच येथील प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.


सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन प्रसंगी माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, पणन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुलशीदास रावराणे, जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मार्केट यार्डची वास्तू दर्जेदार होईलच -आमदार निलेश राणे


वाशी सोडली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार ही एकमेव एपीएमसी राहणार आहे. एपीएमसीचे प्लॅन उत्कृष्ट आहे. अतिशय महत्वाचा पॉईंटवर ही जागा आहे. असे असले तरी आपले काम आता अजून वाढणार आहे. एपीएमसी चालवायची कशी, हे आता आपल्या हातात आहे. एपीएमसी उभी करत असताना इकडे एकही एसी रूम करू नका. आराम करता येईल अशी रूम करू नका. केबिन सगळे उघडे दिसले पाहिजे. कारण हे एपीएमसी आपण शेतकऱ्यांसाठी करत आहोत. जे वाशीला घडले, ते आपल्या जिल्ह्यात घडू नये. एपीएमसी उभी करताना दर्जेदार वास्तू उभी राहिली पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास देतील असे नेते इकडे तयार व्हायला नको, असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.




मार्केट यार्ड जिल्हा विकासाचे महत्त्वाचे स्थान बनणार -पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास


सिंधुदुर्गमध्ये मार्केट यार्ड व्हावे हे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचे स्वप्न होते. त्यांच्या इच्छाशक्तीतून प्रेरणा घेऊन आज या मार्केट यार्डचे भूमिपूजन होत आहे. ही वास्तु आपल्या जिल्ह्यातील शेतकरी, काजू, आंबा बागायतदार यांच्यासहित मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत आपण या जिल्ह्यात मार्केट यार्डचे भूमिपूजन करतो, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. हे मार्केट यार्ड जिल्हा विकासाचे महत्त्वाचे स्थान बनेल. परप्रांतातील आंबा सिंधुदुर्गात आणून देवगड हापूस म्हणून जर विक्री होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

द्विटरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव मुंबई : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण

फ्रान्समध्ये १४५ जणांवर सिरिंज हल्ले, १२ अटकेत

पॅरिस : फ्रान्समधील फेटेस दे ला म्युझिक महोत्सवावेळी धक्कादायक घटना घडली. कार्यक्रम सुरू असताना ठिकठिकाणी

Dilip Doshi Passes Away : माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन!

मुंबई : भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी रात्री लंडन येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे

Gold Silver Rate: सीजफायरनंतर सोन्याचांदीत प्रचंड घसरण! गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची सुवर्णसंधी 'इतक्याने' झाली दर कपात

प्रतिनिधी: इस्त्राईल व इराण युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिझफायर (युद्धबंदी) जाहीर

Stock Market Update: ट्रम्प यांच्या Ceasfire नंतर बाजारात उसळीचे रॉकेट! सेन्सेक्स ८७८.४९ व निफ्टी २७१.५० अंकांने उसळला!

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुगीचा काळ सुरु झालेला आहे. अमेरिकन बाजारातील

लीड्स कसोटीत कोण जिंकणार ? भारत १० विकेट घेणार की इंग्लंड विजयासाठी आवश्यक ३५० धावा करणार ?

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात