Tamilnadu : तामिळनाडूत झाली भाजपा - अण्णाद्रमुक युती

चेन्नई : तामिळनाडूत २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि अण्णाद्रमुक या पक्षांनी युती जाहीर केली आहे. ही युती करत असतानाच भाजपाने तामिळनाडूसाठी नव्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष म्हणून नयनार नागेंद्रन सूत्र हाती घेत आहेत.



भाजपा - अण्णाद्रमुक युती तामिळनाडूत विधानसभेची निवडणूक लढवेल. ही निवडणूक अण्णाद्रमुकचे अध्यक्ष ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी जाहीर केले.



जागावाटप योग्य वेळी जाहीर होईल. निवडणूक जिंकल्यानंतर योग्य वेळी मंत्र्यांबाबतची घोषणा केली जाईल. दोन्ही पक्ष एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही; असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी सांगितले.

नयनार नागेंद्रन यांची तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीत नयनार नागेंद्रन यांच्या विरोधात कोणीही उभे राहिले नाही, असे सांगत अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. तामिळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, माजी केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन, भाजपा आमदार आणि महिला मोर्चा अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी नयनार नागेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदासाठी ठेवला होता. लवकरच के. अण्णामलाई यांच्याकडे पक्षाकडून नवी मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू