Smartphone: उन्हाळ्यात स्मार्टफोन होतोय खूप गरम? वापरा या टिप्स

मुंबई: उकाड्याने आपले प्रचंड रूप दाखवणे सुरू केले आहे. या उकाड्यामुळे केवळ माणूस अथवा प्राणीच त्रस्त झालेले नाहीत तर स्मार्टफोनही त्रस्त होत आहेत. अनेकांची तक्रार आहे की त्यांचा स्मार्टफोन ओव्हरहीट होत आहे. फोनच्या ओव्हरहीटचा अर्थ म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणे.


तसेच स्मार्टफोनमधील एखादा पार्ट्स खराबही होऊ शकतो. अशातच तुम्ही कसा ठेवाल तुमचा स्मार्टफोन कूल कूल... या आहेत टिप्स


सगळ्यात आधी डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आपल्या स्मार्टफोनचे रक्षण करा. फोनला कधीही कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका. यामुळे हँडसेट खराबही होऊ शकतो.


स्क्रीनची ब्राईटनेस कमी ठेवून तुम्ही स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवू शकता. सोबतच ब्लूटूथ, वायाय आणि दुसरे फीचर्सही काम नसताना बंद करा.


जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो काही वेळासाठी एअरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे फोन लवकर थंड होईल.


चार्जिंग करताना स्मार्टफोनचे कव्हर काढा. यामुळे फोन जास्त गरम होणार नाही. तसेच तुम्हाला ओव्हरहिटींगचा त्रासही होणार नाही.


याशिवाय तुम्ही फोनसोबत कूलिंगचा फॅनचा वापर करा. अशातच गेमिंग आणि चार्जिंगवेळेस फोन थंड राहील. जिथे जागा जास्त गरम आहे अशा ठिकाणी आपला फोन चार्जिंग करू नका.


Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले