Kalyan News : कल्याण गुन्हे शाखेची मोठी कारवाई; देशी पिस्तुल आणि काडतुसांसह आरोपीला अटक

  69

कल्याण : कल्याणमधुन मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण गुन्हे शाखा, घटक ३ युनिटच्या पथकाने एक मोठी कारवाई करत विनापरवाना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या बिंदास म्हात्रे (३६) याला अटक केली आहे. मिथुन राठोड या पोलीस शिपायाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.



याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली चक्कीनाका परिसरात एक इसम बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी बिंदास म्हात्रे याला ताब्यात घेतले.


पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे आणि एक रिकाम्या काडतुसाची पुंगळी असा एकूण 62 हजार रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दरम्यान आरोपीने हे पिस्तुल कुठून आणले व यामागील उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली