महारेराचे निर्देश : गृहनिर्माण जाहिरातीत 'नोंदणी क्रमांक, संकेतस्थळ, QR कोड' ठळकपणे छापणे बंधनकारक, उल्लंघन केल्यास ५० हजार दंड

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातीत ‘महारेरा नोंदणी क्रमांक’, ‘महारेराचे (MahaRERA) अधिकृत संकेतस्थळ’ आणि ‘QR कोड’ हे घटक ठळक, वाचनीय आणि जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या फॉन्टमध्ये छापणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराने या संदर्भात परिपत्रक जाहीर करत तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.


या नव्या नियमांनुसार, कोणत्याही माध्यमातून – मग ते छापील जाहिरात असो, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया किंवा लिफलेट्स असोत – जर ही माहिती ठरावीक स्वरूपात न छापली गेली, तर संबंधित विकासकावर ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतर देखील जर १० दिवसांच्या आत चूक दुरुस्त केली नाही, तर “निर्देशांचा सततचा भंग” मानून पुढील कारवाई केली जाणार आहे.



महारेराच्या निरीक्षणानुसार, अनेक जाहिरातींमध्ये ही मूलभूत माहिती अशा प्रकारे दिली जाते की ती ग्राहकांच्या नजरेतच पडत नाही. काही वेळा QR कोड स्कॅनसुद्धा होत नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रकल्पाची खरी माहिती मिळणे कठीण जाते. आता QR कोड जर स्कॅन न होणारा असेल, तर त्यावरही कारवाई होणार आहे.


महारेराचे मत आहे की, घर खरेदीदारांनी पारदर्शक आणि अचूक माहिती सहज पाहता यावी, हा या सर्व नियमांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व विकासकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महारेराने केले आहे. या अंमलबजावणीस सहकार्य करणे ग्राहकहितासाठी अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.