प्रहार    

Aaple Sarkar : 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद

  107

Aaple Sarkar : 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद मुंबई : नागरिकांना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुरू केलेले 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. आधुनिकीकरणाचे काम करायचे असल्यामुळे पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोणतेही शासकीय ऑनलाईन काम १४ एप्रिलपर्यंत 'आपले सरकार' पोर्टलद्वारे करता येणार नाही.



शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने फडणवीस सरकारने 'आपले सरकार' पोर्टल १० वर्षांपूर्वी सुरू केले. या पोर्टलद्वारे जलदगतीने सेवा मिळतात. वेगवेगळी प्रमाणपत्र ऑनलाईन पटकन मिळतात. कार्यालयात जाण्याचा, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो. वेळ आणि पैसा यांची बचत होते. आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, ओळख पुरावा, नरेगा जॉब कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र अशी अनेक कागदपत्रे 'आपले सरकार' पोर्टलद्वारे लवकर मिळवता येतात.



शासनाच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित अनेक सेवा 'आपले सरकार' पोर्टलद्वारे उपलब्ध असल्यामुळे सामान्यांचे काम सोपे होते. यामुळे असंख्य नागरिक 'आपले सरकार' पोर्टलचा वापर करतात. मागील काही वर्षात विश्वासार्ह, वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवेमुळे 'आपले सरकार' पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

सध्या राज्यातील ३८ विभागांच्या ४८५ सेवा 'आपले सरकार' पोर्टलवर आहेत. नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळवता येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०१५ पासून आपले सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत एकूण १७ कोटी ६३ लाख ६२ हजार ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १६ कोटी ६१ लाख ३ हजार ९०९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ६६ लाख २३ हजार २७५ अर्ज आले होते.
Comments
Add Comment

Nitesh Rane : महायुतीचा विजय हिंदूंच्या मतांवर, बाकी धर्मियांचे मतदान शून्य : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे

कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर

Devendra Fadnavis BDD Chawl : 'छप्पर गळतंय, भिंती पडतायत'… BDD रहिवाशांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेला हृदयद्रावक किस्सा

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला आज ऐतिहासिक वळण मिळाले. मुख्यमंत्री

कबुतरखान्यावर राज ठाकरेंची पहिली सडेतोड प्रतिक्रिया "या वादात लोढा-बिढांनी येऊ नये"

मुंबई : गेल्या काही दिवसापासून दादरमधील कबुतरखाना वाद पेटला असून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच

Shilpa Shetty And Raj Kundra : ६० कोटींचा घोटाळा? शिल्पा-राज पुन्हा कोर्टाच्या दारात, आता काय केलं नेमकं?

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) वादाच्या भोवऱ्यात अडकले

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

मुंबई : ‘बिग बॉस १८’मुळे (Bigg Boss 18) पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदच्या दशकात गाजवलेली