वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १६ एप्रिलला सुनावणी

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर वक्फ कायदा प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष यांच्यासह एआयएमआयएम या पक्षांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात १० पेक्षा अधिक याचिका दाखल केल्या आहेत.



सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार, सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन हे याचिकांवर सुनावणी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांच्या याचिकेव्यतिरिक्त, न्यायालयाने आप नेते अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, अर्शद मदनी, समस्थ केरळ जमियातुल उलेमा, अंजुम कादारी, तैय्यब खान सलमानी, मोहम्मद शफी, मोहम्मद फजलुररहीम आणि राजद नेते मनोज कुमार झा यांनी दाखल केलेल्या याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध केल्या आहेत.


दरम्यान, मंगळवारी (८ एप्रिल ) केंद्र सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यावरील याचिकांवर काही आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने सुनावणी घ्यावी, अशी विनंती केंद्राने न्यायालयाकडे कॅव्हेटमध्ये केली आहे. याच दिवशी देशभरात वक्फ दुरुस्ती कायदा लागू झाल्याची अधिसूचना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने जारी केली आहे. या अगोदर ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. त्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला