वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १६ एप्रिलला सुनावणी

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर वक्फ कायदा प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष यांच्यासह एआयएमआयएम या पक्षांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात १० पेक्षा अधिक याचिका दाखल केल्या आहेत.



सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार, सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन हे याचिकांवर सुनावणी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांच्या याचिकेव्यतिरिक्त, न्यायालयाने आप नेते अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, अर्शद मदनी, समस्थ केरळ जमियातुल उलेमा, अंजुम कादारी, तैय्यब खान सलमानी, मोहम्मद शफी, मोहम्मद फजलुररहीम आणि राजद नेते मनोज कुमार झा यांनी दाखल केलेल्या याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध केल्या आहेत.


दरम्यान, मंगळवारी (८ एप्रिल ) केंद्र सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यावरील याचिकांवर काही आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने सुनावणी घ्यावी, अशी विनंती केंद्राने न्यायालयाकडे कॅव्हेटमध्ये केली आहे. याच दिवशी देशभरात वक्फ दुरुस्ती कायदा लागू झाल्याची अधिसूचना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने जारी केली आहे. या अगोदर ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. त्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केले.

Comments
Add Comment

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित

Ayodhya Ram Mandir : २५ नोव्हेंबरला राम मंदिरात भाविकांसाठी 'नो एन्ट्री'! अयोध्या सोहळ्यासाठी ८ हजार निमंत्रणे; PM मोदी उपस्थित राहणार!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा

लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका