वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १६ एप्रिलला सुनावणी

  116

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर वक्फ कायदा प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष यांच्यासह एआयएमआयएम या पक्षांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात १० पेक्षा अधिक याचिका दाखल केल्या आहेत.



सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार, सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन हे याचिकांवर सुनावणी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांच्या याचिकेव्यतिरिक्त, न्यायालयाने आप नेते अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, अर्शद मदनी, समस्थ केरळ जमियातुल उलेमा, अंजुम कादारी, तैय्यब खान सलमानी, मोहम्मद शफी, मोहम्मद फजलुररहीम आणि राजद नेते मनोज कुमार झा यांनी दाखल केलेल्या याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध केल्या आहेत.


दरम्यान, मंगळवारी (८ एप्रिल ) केंद्र सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यावरील याचिकांवर काही आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने सुनावणी घ्यावी, अशी विनंती केंद्राने न्यायालयाकडे कॅव्हेटमध्ये केली आहे. याच दिवशी देशभरात वक्फ दुरुस्ती कायदा लागू झाल्याची अधिसूचना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने जारी केली आहे. या अगोदर ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. त्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे