भाजपा ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ देशभरात राबवणार

दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यशाळेचे आयोजन


नवी दिल्ली : भाजपा २० एप्रिल ते ५ मे पर्यंत ‘वक्फ दुरुस्ती जागरूकता अभियान’ देशभरात राबवणार आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यातील सुधारणांच्या फायद्यांची माहिती मुस्लीम समाजाला देणे. वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून जे बोलले जात आहे. त्याविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाची तयारीसाठी राजधानी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात एका कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजेजू यांनी संबोधित केले.



वक्फ दुरुस्ती कायद्यामुळे वंचित मुस्लिमांचा फायदा होईल. विशेषतः शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात वक्फ मालमत्तेचा अधिक चांगला वापर होईल, असे जे. पी. नड्डा कार्यशाळेत म्हणाले. वक्फ विधेयकाबाबत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. मुस्लिम समुदायाची दिशाभूल केली आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.


भाजप कार्यकर्ते मुस्लिम बंधू-भगिनींपर्यंत सक्रियपणे पोहोचतील जेणेकरून विरोधी पक्षांचा खोटेपणा उघड होईल आणि कायद्याचा खरा हेतू आणि फायदे स्पष्ट होतील, असे नड्डा म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी कार्यशाळेत वक्फ सुधारणांबद्दल सविस्तर माहिती दिली. भाजपने प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षांसह तीन ते चार नेत्यांना या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. जिल्हास्तरीय भाजप नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या संबंधित राज्यात अशाच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश या नेत्यांना देण्यात आले आहेत. या अभियानाद्वारे, भाजपचा हेतू वक्फ सुधारणांबद्दलचे सत्य तळागाळातील पातळीपर्यंत पोहोचवणे आहे.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी