Shirdi News : भिक्षुक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! “मयत भिक्षुक नव्हतेच”; नातेवाईकांचा दावा

शिर्डी : शिर्डी येथे पोलिसांनी केलेल्या भिक्षुकांवरील कारवाईनंतर उडालेल्या गोंधळात आता नवे वळण आले आहे. कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांपैकी चार जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांनी आता थेट प्रशासनावर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. “मृत्यू झालेली व्यक्ती भिक्षुक नव्हतीच, प्रशासनाच्या चुकीच्या ओळखीमुळे आणि उपचारातील हलगर्जीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला,” असा दावा नातेवाईकांनी केला आहे.


शिर्डीत अलीकडे भिक्षुकांमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम राबवत तब्बल ५० जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर काही जणांना श्रीगोंद्याजवळील विसापूर येथे हलवण्यात आले, तर दहा जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, दोनवर सध्या उपचार सुरू आहेत. उर्वरित चार जण रुग्णालयातून पळून गेले.



दरम्यान, मृतांपैकी दोन जणांची ओळख पटल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “आमचे नातेवाईक हे भिक्षुक नव्हतेच. त्यांनी काम करून उदरनिर्वाह चालवला होता. प्रशासनाने कोणतीही योग्य तपासणी न करता त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि नंतर रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांची अत्यंत अमानुष वागणूक झाली.”


नातेवाईकांचा आरोप आहे की रुग्णांना पाण्याविना ठेवले गेले, हातपाय बांधून ठेवण्यात आले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कोणतीही योग्य निगा राखली गेली नाही. “ही थेट प्रशासनाची चूक असून आमच्या नातेवाईकांचा मृत्यू हा त्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली.


विसापूर येथील भिक्षेकरी गृहात मयत झालेले शिर्डी जवळील पिंपळस येथील सारंगधर वाघमारे व शिर्डीतील इसार शेख यांच्या नातेवाईकांनी या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


बुधवारी शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पार्थिवासह शिर्डी पोलीस ठाणे गाठले. हे भिक्षेकरी नसतांना त्यांना पोलीस, नगरपालिका व साईसंस्थानने पकडले. कोर्टाने त्यांना तिकडे विसापूरला पाठवले. तिथे त्यांना बांधून ठेवण्यात आले, अन्न पाणीही देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करत याला संबंधित यंत्रणा जबाबदार आहेत, याप्रकरणी फिर्याद दाखल करा, अशी नातेवाईकांची मागणी केली.


आमचा बाप जिवंत नेला, जिवंत आम्हाला परत द्या अशी आर्त भावना वाघमारे यांच्या मुलगा, मुली व नातेवाईकांनी व्यक्त केली. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हंबरडा फोडला. त्यांच्या बरोबर बौद्ध भिक्खु पण ठाण्यात आले होते.


पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी यासंदर्भात पंचनामा व शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचे फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे उपस्थित होते.


रिपाईची जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, नाशिकचे अॅड राहुल तूपलोंढे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी नातेवाईकांच्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या.


शिर्डी पोलीस ठाण्यात बुधवारी मयत शेख व वाघमारे यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.


या प्रकारामुळे आता शिर्डीमधील प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि शिर्डीकर यावर कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा