Ahilyanagar News : शिर्डीत पकडलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू

अहिल्यानगर : शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला.



भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. भिक्षेकऱ्यांवर उपचार करताना हलगर्जीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.



साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या भाविकांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गांतील भाविक असतात. या भाविकांना सामोरे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी मंदिराच्या आवारात भिक्षेकरी गर्दी करतात. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना भिक्षेकऱ्यांकडून होणारा त्रास वाढत होता. या संदर्भात तक्रारी वाढू लागल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. या भिक्षेकऱ्यांमध्ये चार राज्यांतील बारा जिल्ह्यांतील भिक्षेकरी होते. न्यायालयाच्या आदेशानंतर भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली होती. आजारी असलेल्या भिक्षेकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातच उपचार घेत असलेल्यांपैकी चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. तपासाअंती कायद्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.