Shirdi News : इस्रोचा माजी अधिकारी शिर्डीत मागतोय भीक; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या

अहिल्यानगर : शिर्डीत सध्या चोरांसोबत भीक मागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर हे भिक्षेकरी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शिर्डीत वारंवार पोलिसांची कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. यात काही जण इंग्रजी बोलत पैसे मागत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एका जणाने आपण इस्रोमधील माजी अधिकारी असल्याचा दावा केलाय. या घटनेने पोलीसही आवाक झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने सण-उत्सव काळात भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबविली जाते. या काळात शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. या ५० भिक्षेकऱ्यांमध्ये काही भिक्षेकरी फाडफाड इंग्लिशमध्ये बोलत पैसे मागत असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी चौकशी केल्यावर एका भिक्षेकऱ्याने इस्रोमधील माजी अधिकारी असल्याचं सांगितलं. याशिवाय आपण इस्रोमध्ये चांद्रयान मोहिमेत काम केल्याचा दावाही त्यानं केला आहे. या भिक्षेकऱ्याचं नाव के. एस. नारायण (वय ६० ) असल्याचं समजतंय. तो २००८ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून नियमित शिर्डीला येत आहे; मात्र यावेळी नाशिकमध्ये पैसे चोरीला गेल्याने शिर्डीत पैसे मागत असल्याचे त्याने सांगितले. याबाबत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी माहिती दिली.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .