BMC NEWS : मुंबईतील पहिला रोबोटिक वाहनतळ ठरला पांढरा हत्ती

भुलाभाई देसाई मार्गावरील पहिले रोबोटिक वाहनतळ ठरते पांढरा हत्ती

देखभालीचा खर्च महिन्याला १५ लाखांचा खर्च

मुंबई, खास प्रतिनिधी : दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील नुतनीकरण करून पहिले स्वयंचलित वाहनतळ लोकांसाठी खुले करून दिल्यानंतर आता या वाहनतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीच महिन्याला सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर येत आहे. खासगी विकासकाकडून हे वाहनतळ महापालिकेला हस्तांतरीत झाल्यानंतर त्यावर महापालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. त्यानंतर लोकांसाठी हे रोबोटिक वाहनतळ खुले करून दिल्यानंतर याच्या देखभालीसाठी ९ महिन्यांच्या कालावधी करताच १ कोटी ३७ लाखांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.



मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रात असणा-या भुलाभाई देसाई मार्गालगत व सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराजवळ असणा-या हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित वाहनतळ जुलै २०२१मध्ये मुंबईकरांच्या सेवेत खुले करण्यात आले. या २१ मजली वाहनतळामध्ये साधारणपणे २४० वाहने उभी करता येईल, एवढी जागा उपलब्ध आहे. या वाहनतळाला २ प्रवेशद्वारे असून २ बहिर्गमन द्वारे आहेत. या वाहनतळाची स्वयंचलित प्रचालन क्षमता ही दर तासाला ६० वाहनांचे प्रचालन करण्याइतकी आहे. हे वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्याा अधिकाऱ्यांनी दिली आहे. या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरीता २ मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त २ शटल डिव्हाइस व २ सिलोमेट डॉली आहेत. तसेच कार वळविण्यासाठी ४ स्वयंचलित टर्न टेबलही या वाहनतळामध्ये आहेत.



या बहुमजली पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक वाहनतळाची दरुस्ती प्रचलन व परिरक्षणाच्या कंत्राट कामांसाठी खासगी संस्थेची निवड करण्यात आली आहे. या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने नवीन संस्थेची निवड करण्यात येत असून यासाठी ९ महिन्यांच्या देखभालीच्या कामासाठी तब्बल १ कोटी ३६ लाख ५७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. हा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत होता.



महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनतळाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून या कंपनीसोबत अंतिम निवड तसेच त्यांच्यासोबत वाटाघाटी करणे सुरु आहे, परंतु त्यादरम्यान वाहनतळ बंद राहू नये यासाठी संबंधित कंपनीकडून प्रथम सहा महिने आणि त्यानंतर जानेवारी ते मार्च या दरम्यान ३ महिन्यांकरता अशाप्रकारे ९ महिन्यांचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे पात्र कंपनीला अंतिम मंजुरीने पुढील जबाबदारी सोपवली जाईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे