Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी प्रकरणातील मास्टरमाइंड झिशान पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगला आरोपी ठेवण्यात आले असून मुंबई गुन्हे शाखेने एकूण २६ जणांना अटक केली होती. परंतु कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्यात यश येत नव्हते. मात्र आता या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंडला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक करुन त्यांची चौकशी केली होती. तेव्हा मुख्य कट रचणाऱ्या शुभम लोणकर, झीशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांची नावे समोर आली. यामधील झीशान अख्तर (Zeeshan Akhtar) फरार झाला असून मंगळवारी पंजाबमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात झिशान अख्तरसह त्याच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.



पंजाब भाजपाचे माजी अध्यक्ष्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला


पंजाब भाजपाचे माजी अध्यक्ष मनोरंजन कालिया यांच्या जालंधर येथील घरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, परंतु घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि कार-दुचाकींचे नुकसान झाले. पोलिसांनी या घटनेलसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदार ठरवले.



कोण आहे झिशान अख्तर?


झीशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा ९ गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. ७ जून २०२४ रोजी जीशान तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला. गँगस्टर लॉरेन्सच्या सूचनेनंतर झीशानने बाबा सिद्दिकीची हत्या केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झिशान गुन्हेगार बनला. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी