Crime : लग्नाच्या आश्वासनाला भुलली आणि होत्याच नव्हतं झालं

पुणे : लग्नाचे आश्वासन देऊन मुलींना फसवणाऱ्यांची संख्या जगात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंड येथे नेत लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर तरुणीकडून २५ लाख रुपये उकळण्यात आले. यासंदर्भात २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील मालाड मधील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. त्या वेळी आरोपी कबीर खान (वय ३०) याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आत्तापर्यंत पुणे, सांताक्रुझ, मुंबई, नेपाळ, थायलंड आणिअझरबैजान या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने बँक खाते जास्त व्यवहारांमुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिसा तयार करायचा आहे, यासह विविध कारणे सांगून तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. पैसे उकळल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान या घटनेचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.