Crime : लग्नाच्या आश्वासनाला भुलली आणि होत्याच नव्हतं झालं

  52

पुणे : लग्नाचे आश्वासन देऊन मुलींना फसवणाऱ्यांची संख्या जगात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंड येथे नेत लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर तरुणीकडून २५ लाख रुपये उकळण्यात आले. यासंदर्भात २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील मालाड मधील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. त्या वेळी आरोपी कबीर खान (वय ३०) याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आत्तापर्यंत पुणे, सांताक्रुझ, मुंबई, नेपाळ, थायलंड आणिअझरबैजान या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने बँक खाते जास्त व्यवहारांमुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिसा तयार करायचा आहे, यासह विविध कारणे सांगून तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. पैसे उकळल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान या घटनेचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.