PAT Exam Inquiry : ‘पॅट’ परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

  115

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) घेण्यात येत असलेल्या ‘पायाभूत चाचणी परीक्षा-दोन’ (पॅट) परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एससीईआरटीने संबंधित युट्युब चॅनलच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, या प्रकरणाची सखोल चौकशीही शिक्षण विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या पॅट परीक्षेला सुरवात झाली आहे. या अंतर्गत इयत्ता नववीची मराठी प्रथम भाषा या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मिडियाद्वारे फुटली. केवळ एकाच नव्हे तर जवळपास २० हून अधिक यु-ट्युब चॅनलवर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे दिसून आले.



अर्थात, एससीईआरटीमार्फत संबंधित युट्यूब चॅनेल्सच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईचा बडगा उगारला. परंतु, मुळात ही प्रश्नपत्रिका नेमकी फुटली कोठून याचा शोध एससीईआरटीने घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.