कुर्ला, पवई, बोरिवली येथील ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय

अंतिम मंजुरीसाठी प्रशासनाकडे संबंधित प्रस्ताव सादर


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी, तसेच पर्यावरण संतुलनासाठी महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला, पवई, बोरिवली येथील तब्बल ४ एकर भूखंडावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर सुमारे ३.५ हजार झाडांचे पारंपरिक पद्धतीने रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात येणार आहे.


मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पर्यावरणाला बसत आहे. विकासकामांआड येणाऱ्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. दरम्यान, पर्यावरणाशी समतोल साधत विकासकामांवर भर देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत वेळोवेळी वृक्षारोपण केले जाते. वृक्षसंपदेत वाढ कावी यादृष्टीने गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी वृक्षलागवडीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आता लवकरच महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल ४ एकर भूखंडावर पारंपरिक पद्धतीने ३.५ हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. याबाबत राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.



झाडांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर


वृक्ष लागवडीचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. वृक्ष लागवड आणि झाडांच्या सुरुवातीच्या देखभालीची सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून दोन वर्षांनंतर या झाडांची देखभाल महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत केली जाणार आहे, विकासकाने पवई, कुर्ला आणि योरिवलीतील जागेवर चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करून टीडीआर स्वरूपात तीन भूखंड महापालिकेला वृक्षारोपणासाठी हस्तांतरित केले, त्यानतर महापालिकेने या ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्ताच्या मंजुरीनंतर या भूखंडांवर हरित क्षेत्र विकसित होणार आहे. परिणामी, पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला