Dombivali : डोंबिवलीत मराठीवरुन वाद! महिलेने 'एस्क्युज मी' बोलताच तरुणांकडून मारहाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी भाषेवरुन वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जात असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. इंग्रजी नाही तर मराठी भाषेचा वापर व्हावा; यासाठी मनसेकडून आग्रह धरला जात आहे. अशातच डोंबिवलीमध्ये (Dombivali) सहज वापरल्या जाणाऱ्या 'एस्क्युज मी' या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महिलेने काही तरुणांना 'एस्क्युज मी' बोलताच त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली. इतकेच नव्हे तर महिलेच्या घरच्यांनाही मारहाण केल्याचे समोर आले आहे.



डोंबिवली (Dombivali) पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. पुनम गुप्ता नावाची महिला काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत घराकडे जाण्यासाठी निघाली होती. यावेळी रितेश बाबासाहेब ढबाले या तरुणासह त्याचे मित्रमंडळी बिल्डिंगबाहेर रस्त्यावर उभे होते. त्यांना बाजूला होण्यासाठी पुनम गुप्ताने "Excuse me" असे इंग्रजीत म्हटले. मात्र एक्सक्युज मी म्हणताच तरुण संतापले आणि त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.


वाद होताच रितेश ढबाले, त्याची पत्नी आणि त्याच्या वडिलांसह काही साथीदारांनी "इंग्रजी नको, मराठीत बोला" म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापट्या मारून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर या गोंधळात पुनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. (Dombivali Crime)


दरम्यान, या घटनेबाबत विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्ह्यांची नोंद करत तपास सुरू केला आहे. परंतु या वादामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा