Solapur Crime : सोलापूर हादरलं! विठुरायाचं दर्शन घेऊन आले अन् भर रस्त्यात दाम्पत्यावर गोळीबार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मन हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान, त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट झाले असून घटनास्थळी सर्वच अधिकाऱ्यांनी धाव घेतली.घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार झाला आहे. सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी एक अधिकारी व १० कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले आहे. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेंडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अधिक माहिती दिली.



शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये शिवाजी जाधव यांना १ गोळी तर सुरेखा जाधव यांना ३ गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजतंय. शिवाजी जाधव (६५) आणि सुरेखा जाधव (६०) यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.



दाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर धडाधड गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये