Solapur Crime : सोलापूर हादरलं! विठुरायाचं दर्शन घेऊन आले अन् भर रस्त्यात दाम्पत्यावर गोळीबार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मन हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान, त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट झाले असून घटनास्थळी सर्वच अधिकाऱ्यांनी धाव घेतली.घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार झाला आहे. सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी एक अधिकारी व १० कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले आहे. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेंडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अधिक माहिती दिली.



शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये शिवाजी जाधव यांना १ गोळी तर सुरेखा जाधव यांना ३ गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजतंय. शिवाजी जाधव (६५) आणि सुरेखा जाधव (६०) यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.



दाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर धडाधड गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा