Amravati Accident : डोळ्यात राख उडाल्याने अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडले

अमरावती : भरधाव वाहनांमधून उडणाऱ्या राखेमुळे महामार्गालगत असलेल्या अनेक गावातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वाहनचालकांच्या डोळ्यात ही केमिकलयुक्त राख शिरत असल्याने अपघाताची शक्यता आहे असे असतांनाही या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे मंगळवारी एका २८ वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले. नांदगाव पेठ बस स्टॅन्ड वर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाहनातील राख हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात शिरल्यामुळे अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ऋषिकेश सुभाष निंभोरकर (२८) रा. नांदुरा बु.हा युवक जागीच ठार झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी शवागृहासमोर आक्रोश करत राखेच्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी ही मागणी रेटून धरत मृतदेह उचलण्यास नकार दिला होता.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,ऋषिकेश निंभोरकर हा बिझिलँड येथील एटीएम वर कार्यरत होता. मंगळवारी दुपारी आपले कर्तव्य बजावून दीड वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ वरून नांदुरा बु येथे जात असतांना विरुद्ध दिशेने येत असलेल्या हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात भरधाव वाहनातील राख उडाल्यामुळे हार्वेस्टर चालकाचे संतुलन बिघडले आणि समोरून येणाऱ्या ऋषिकेशच्या वाहनाला अनियंत्रित हार्वेस्टरने जबर धडक दिली. या अपघातात ऋषिकेश जागीच ठार झाला तर हार्वेस्टर चालकाने तेथून पोबारा केला.



घटनेनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी हार्वेस्टर चालकाला ताब्यात घेतले आणि ऋषिकेशचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी शवागृहासमोर आक्रोश करत मृतदेह उचलण्यास मनाई केली. ऋषिकेश हा प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता असल्याने प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू व प्रहार कार्यकर्ते शवागृहाजवळ पोहचले. छोटू महाराज वसू यांनी कुटुंबीयांचा आक्रोश बघताच पोलीस आयुक्त यांना भेटून रतन इंडिया मधून येणाऱ्या राखेच्या वाहनांवर प्रशासन का कार्यवाही करत नाही असा सवाल उपस्थित केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,उपायुक्त सागर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तसेच मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी त्यांनी छोटू महाराज वसू व कुटुंबियांना विश्वासात घेऊन या संदर्भात पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. व त्यानंतर लगेच प्रादेशिक परिवहन विभागाचे मो वा नि. निलेश दहेकर, पल्लवी दौड, स.मो. वा.नि. निलेश जाधव, कांचन जाधव, नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प या कंपनीवर तसेच राखेच्या वाहनांवर योग्य ती कार्यवाही करून मृतक ऋषिकेशला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी पत्र मृतकाच्या कुटुंबियांना दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी ऋषिकेशचा मृतदेह ताब्यात घेऊन नांदुरा बु येथील त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू वसु महाराज, प्रशांत शिरभाते, इमरान शहाल,नितीन शिरभाते, सचिन महल्ले, मयूर निंभोरकर, ऋषिकेश पंचवटी, गजानन भूगूंल, चंदू खेडकर, विशुद्ध जंवजाळ, निलेश पानसे, चंदू उगले व नांदुरा बुद्रुक येथील गावकरी उपस्थित होते.



वृद्ध वडिलांचा आधार होता ऋषिकेश


ऋषिकेशच्या आईचे निधन झाल्यामुळे ऋषिकेश आणि त्याचे वृद्ध वडील हे दोघेच राहत होते. ऋषीकेश हा वडिलांचा एकुलता एक आधार होता. आपली नोकरी सांभाळून आपल्या वडिलांचा सांभाळ तो करत होता.मात्र तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे वृद्ध वडिलांचा आधार हिरावला गेला.

Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य