मुंबई : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बँक, दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ते तपासायचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जावून मराठी भाषेचा आग्रह धरला. या दरम्यान काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी अशा कर्मचाऱ्यांना चोपही दिला.
या घटनेमुळे अमराठी बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या आग्रहानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत, असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमराठींकडून मराठी भाषिकांवर हल्ला होण्याच्या घटना देखील घडल्या. तसेच एका टेलिफोन कंपनीच्या गॅलरीत गेल्यावर तिथल्या महिला कर्मचान्याला ग्राहकाने मराठीत बोलण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मराठी येत नाही, असं म्हटलं. अशा बऱ्याच घटना घडल्या. या घटनांवरुन मनसे आक्रमक झाली. मनसेकडून नेहमी मराठी भाषेसाठी विविध आंदोलने करण्यात आलेली आहेत.
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…
रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…