मराठीवरून पुन्हा राज ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल!

  69

मुंबई : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बँक, दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ते तपासायचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जावून मराठी भाषेचा आग्रह धरला. या दरम्यान काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी अशा कर्मचाऱ्यांना चोपही दिला.


या घटनेमुळे अमराठी बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या आग्रहानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.


सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत, असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमराठींकडून मराठी भाषिकांवर हल्ला होण्याच्या घटना देखील घडल्या. तसेच एका टेलिफोन कंपनीच्या गॅलरीत गेल्यावर तिथल्या महिला कर्मचान्याला ग्राहकाने मराठीत बोलण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मराठी येत नाही, असं म्हटलं. अशा बऱ्याच घटना घडल्या. या घटनांवरुन मनसे आक्रमक झाली. मनसेकडून नेहमी मराठी भाषेसाठी विविध आंदोलने करण्यात आलेली आहेत.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची