BJP : कर्जत नगरपंचायतीत लवकरच सत्तांतर होणार ?

अहिल्यानगर : कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत रात्री गुप्त बैठक केली. या बैठकीमुळे कर्जत नगरपंचायतीत लवकरच सत्तांतर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्तांतर झाल्यास हा आमदार रोहित पवार यांच्यासाठीचा मोठा राजकीय धक्का असेल, अशी चर्चा आहे. बैठक झाल्याच्या वृत्ताला राम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.



कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १२ आणि काँग्रेसचे ३ असे एकूण १५ नगरसेवक आहेत. भाजपाचे कर्जत नगरपंचायतीत २ नगरसेवक आहेत. पण सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपाला साथ दिल्यास चित्र बदलेल. सध्या कर्जत नगरपंचायतीत शरद पवार गटाच्या उषा राऊत नगरध्यक्ष आणि काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष आहेत. पण एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याची भूमिका घेत अनेक नगरसेवकांनी नारजी व्यक्त केली आहे.



महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे. यामुळे राम शिंदे यांना साथ देऊन कामं मार्गी लावत विकास निधी मिळवायचा या विचारानेच मविआच्या नगरसेवकांनी शरद पवार गट आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपात जाण्याची तयारी केली आहे.

भाजपाच्या स्थापना दिनी रविवारी प्रा.राम शिंदे म्हणाले की, ‘पूर्वी इतर पक्षातील नेते भाजपाला हिणवायचे, टोमणे मारायचे. आता हे टिंगल टवाळी करणारेच भाजपच्या आश्रयाला येऊन बसत आहेत. याचा अर्थ आपले विचार आता सर्वांना पटायला लागले आहेत. मात्र, पक्षाच्या विचारांना जर कोणी छेद देत असेल तर त्याच्या विरोधात लढा उभारण्याची तयारी ठेवावी लागेल’ असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.
Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद