BJP : कर्जत नगरपंचायतीत लवकरच सत्तांतर होणार ?

अहिल्यानगर : कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत रात्री गुप्त बैठक केली. या बैठकीमुळे कर्जत नगरपंचायतीत लवकरच सत्तांतर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्तांतर झाल्यास हा आमदार रोहित पवार यांच्यासाठीचा मोठा राजकीय धक्का असेल, अशी चर्चा आहे. बैठक झाल्याच्या वृत्ताला राम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.



कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १२ आणि काँग्रेसचे ३ असे एकूण १५ नगरसेवक आहेत. भाजपाचे कर्जत नगरपंचायतीत २ नगरसेवक आहेत. पण सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपाला साथ दिल्यास चित्र बदलेल. सध्या कर्जत नगरपंचायतीत शरद पवार गटाच्या उषा राऊत नगरध्यक्ष आणि काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष आहेत. पण एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याची भूमिका घेत अनेक नगरसेवकांनी नारजी व्यक्त केली आहे.



महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे. यामुळे राम शिंदे यांना साथ देऊन कामं मार्गी लावत विकास निधी मिळवायचा या विचारानेच मविआच्या नगरसेवकांनी शरद पवार गट आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपात जाण्याची तयारी केली आहे.

भाजपाच्या स्थापना दिनी रविवारी प्रा.राम शिंदे म्हणाले की, ‘पूर्वी इतर पक्षातील नेते भाजपाला हिणवायचे, टोमणे मारायचे. आता हे टिंगल टवाळी करणारेच भाजपच्या आश्रयाला येऊन बसत आहेत. याचा अर्थ आपले विचार आता सर्वांना पटायला लागले आहेत. मात्र, पक्षाच्या विचारांना जर कोणी छेद देत असेल तर त्याच्या विरोधात लढा उभारण्याची तयारी ठेवावी लागेल’ असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद