मोबाईलवर शिवी दिल्याने दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, तिसऱ्याच्या घराचे छत तुटले!

ठाणे : मोबाईलवर वापरलेल्या अपशब्दामुळे सुरू झालेल्या वादाने भिवंडीतील देवनगर परिसरात गंभीर वळण घेतले. दोन कुटुंबांमध्ये सुरु झालेली शाब्दिक झटापट थेट हाणामारीत रूपांतरित झाली आणि त्याचा फटका एका तिसऱ्या कुटुंबाला बसला. त्यांच्या घराचे छत तुटले आणि नुकसान भरपाईही द्यावी लागली.



नेमकं घडलं काय?


देवनगरमधील एका महिलेने मोबाईल फोनवरून दुसऱ्या कुटुंबातील सदस्याला अपशब्द वापरले. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि तो इतका चिघळला की शेजारच्या घराच्या पत्र्यावर गेलेल्या एकाला मारण्यासाठी काहीजण वर चढले. त्याला साथ देण्यासाठी दुस-या परिवारातील लोकही छतावर आले. त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळात तिसऱ्याच कुटुंबाच्या घराचे छप्पर तुटले. यामध्ये काहीजण खाली कोसळले आणि किरकोळ जखमी झाले.



छताचे नुकसान, भरपाईचे पैसे


ज्या घराचे छत तुटले त्या घरात काही कामगार राहत होते. घटनेनंतर स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करून वाद मिटवण्यात आला. पोलिसात कोणतीही तक्रार दाखल न करता दोन्ही कुटुंबांनी छप्पर तुटलेल्या घरासाठी नुकसान भरपाई देऊन समझोता केला.



पोलीस हस्तक्षेप न करता वाद मिटला


ही घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दोन्ही पक्षांनी आपापसात समझोता केल्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात