मोबाईलवर शिवी दिल्याने दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, तिसऱ्याच्या घराचे छत तुटले!

  40

ठाणे : मोबाईलवर वापरलेल्या अपशब्दामुळे सुरू झालेल्या वादाने भिवंडीतील देवनगर परिसरात गंभीर वळण घेतले. दोन कुटुंबांमध्ये सुरु झालेली शाब्दिक झटापट थेट हाणामारीत रूपांतरित झाली आणि त्याचा फटका एका तिसऱ्या कुटुंबाला बसला. त्यांच्या घराचे छत तुटले आणि नुकसान भरपाईही द्यावी लागली.



नेमकं घडलं काय?


देवनगरमधील एका महिलेने मोबाईल फोनवरून दुसऱ्या कुटुंबातील सदस्याला अपशब्द वापरले. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि तो इतका चिघळला की शेजारच्या घराच्या पत्र्यावर गेलेल्या एकाला मारण्यासाठी काहीजण वर चढले. त्याला साथ देण्यासाठी दुस-या परिवारातील लोकही छतावर आले. त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळात तिसऱ्याच कुटुंबाच्या घराचे छप्पर तुटले. यामध्ये काहीजण खाली कोसळले आणि किरकोळ जखमी झाले.



छताचे नुकसान, भरपाईचे पैसे


ज्या घराचे छत तुटले त्या घरात काही कामगार राहत होते. घटनेनंतर स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करून वाद मिटवण्यात आला. पोलिसात कोणतीही तक्रार दाखल न करता दोन्ही कुटुंबांनी छप्पर तुटलेल्या घरासाठी नुकसान भरपाई देऊन समझोता केला.



पोलीस हस्तक्षेप न करता वाद मिटला


ही घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दोन्ही पक्षांनी आपापसात समझोता केल्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.