अवकाळीचा शेतक-यांना मोठा फटका; आंबा, द्राक्ष, डाळींब, कांदा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rains) सटाणा, कळवण, दिंडोरी, नाशिक या चार तालुक्यांना चांगलेच झोडपले. अवकाळीमुळे कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १२९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात ११७५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९० आहे.


हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस लगबगीने सुरूवात केली होती. मात्र, काढून ठेवलेला कांदा शेतातच झाकून ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच काढणी योग्य कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात झाले असून तालुक्यात ११०० क्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. ५० हेक्टरवरील भाजीपाला, १५ हेक्टरवरील डाळिंब अशा एकूण ११५५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या पावसामध्ये पीका नुसार कांदा - ११७५, द्राक्ष -१९.८० भाजीपाला - ६०.६०, गहू - १०, टोमॅटो १०, डाळींब -१९.६०, इतर २, हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.



तालुक्यातील औंदाणे, कौतिकपाडे, बिजोठे, आखतवाडे, निताणे, पारनेर, जायखेडा, नांदीन, दरेगाव, तांदूळवाडी, मोसम आरम परिसरात गारांचा पाऊस झाल्याने तालुक्यातील १७०० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. दिंडोरी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. पावसाचा कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसला प्राथमिक अहवालानुसार ८ हेक्टरवरील कांदा, ५.८० हेक्टरवरील द्राक्षे अशा एकूण १५ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. कळवण तालुक्यात ५५ हेक्टरवरील कांदा, १० हेक्टरवरील भाजीपाला व १० हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे.



बार्शीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी, मळेगाव, हिंगणी, बोरगाव, झाडी, उपळे, महागाव, पिंपळगाव, जामगाव, कापशी परिसरात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास कोसळलेल्या या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.


दोन दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होते. दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली पिके मोठ्या प्रमाणावर भिजली. कांदा, ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांवरही या पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंबा, द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Comments
Add Comment

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला