कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस, शहापूर तालुक्यात गारपीट!

मुंबई : अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच कल्याण-डोंबिवली, पनवेल, शहापूर, नवी मुंबईत आधी धुळीचे वादळ आले. त्यानंतर सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.


आधी सोसाट्याचा वारा, धूळ आणि काळोख झाला. त्यामुळे जोरदार पाऊस येणार असल्याने पादचारी, दुकानदार, भाजी बाजार यांमध्ये धावपळ उडाली, आणि तेवढ्यात पाऊस आला. वारा आणि पावसाच्या सरी पडल्यानंतर मात्र वातावरण शांत झाले.


?feature=share

शहापूर तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी


शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, वादळी वाऱ्यासह गारपीट पडत आहेत. सध्या उकाड्याने हैराण झाले असून, उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून, तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे.



अवकाळी पावसामुळे व्यापा-यांच्या मालाचे काही प्रमाणात नुकसान झाले. काही परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. आधीच उकाडा त्यात वीज नसल्याने पंचाईत झाली.


डोंबिवली शहरात दुपारी तीन वाजल्यापासून वादळी वारे सुटले होते. दरम्यान, हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला होता. बदलापूरमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊसाची सुरूवात झाली.


कल्याण शहरात दुपारी साडे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे पादचाऱ्यांसह फेरीवाल्यांची धांदल उडाली. काहींनी रेनकोट, छत्री घेऊन तर काहींनी भिजून या पावसाचा आनंद घेतला.

Comments
Add Comment

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड

BMC News : रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध; स्तनाचा कर्करोग पिडीत महिलांची धावपळ वाचेल

- शीव आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण मुंबई (विशेष

BMC News : दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत

- मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम ४४ तासांच्‍या प्रयत्‍नानंतर पूर्ण मुंबई (विशेष प्रतिनिधी) जी दक्षिण विभागातील

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Central Railway : मुंबई PRS प्रणाली बंद; PNR फाईल कॉम्प्रेशनमुळे काही रेल्वे सेवा तात्पुरत्या ठप्प

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये PNR फाईल कॉम्प्रेशनच्या तांत्रिक देखभाल कामासाठी

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या