Cid ACP Pradyuman : मोठी बातमी! 'सीआयडी' मध्ये होणार ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू?

अभिनेते शिवाजी साटम यांची एक्झिट!


मुंबई : सोनी टीव्हीवरील दीर्घकाळ चालणाऱ्या शो 'सीआयडी'मध्ये एसीपी प्रद्युम्नची प्रतिष्ठित भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आता या मालिकेला निरोप देण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आणि त्यांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणारी मालिका म्हणजे 'सीआयडी' (CID). सस्पेन्स-क्राईम असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० वर्ष मालिका चालली. २०१८ साली या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच मालिका सीझन २ सह पुन्हा सुरु झाली. आता यामध्ये एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांचाच मृत्यू दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नुकताच हा एपिसोड शूट करण्यात आला आहे.



अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना कायम एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं. त्यांना या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेत सीआयडीचे तेच प्रमुख दाखवण्यात आले आहेत. मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचं हे पात्र मरणार आहे. बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू होतो असा तो सीन दाखवण्यात येणार आहे. येत्या एपिसोडमध्ये बारबुसा (तिग्मांशू धुलिया) सीआयडी टीमला संपवण्यासाठी बॉम्ब लावतो. या घटनेत इतर सदस्य सुरक्षित राहतात पण एसीपी प्रद्युम्न यांचा दुर्देवी मृत्यू होतो. तिग्मांशू धुलिया मालिकेत कुख्यात गँगस्टर बारबोसाची भूमिका साकारत आहे.


दरम्यान, कलाकारांनी या एपिसोडचं नुकतंच शूटही केलं आहे. काही दिवसात हा एपिसोड प्रसारित होणार आहे. यापेक्षा अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही कारण हा चाहत्यांना मोठा धक्का मिळेल अशी मेकर्सची माहिती आहे.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा