Share

सद्गुरू वामनराव पै

जगात प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. तो निर्माण झाला याचा अर्थच तो उपयुक्त आहे. सफाई कामगार किती उपयुक्त? उद्या जर ठरवून ते आलेच नाहीत, त्यांनी कचरा नेलाच नाही, तर आपल्याला नाक धरण्याची वेळ येईल. घराबाहेर पडणे गैरसोयीचे होईल. हे कधी? जर सफाई कामगारांनी संप पुकारला तर. कारकुनांनी संप पुकारला तरी तेच, अधिकाऱ्यांनी संप पुकारला तरी तेच. डॉक्टरांनी संप पुकारला तर अवघा Chaos होईल. कारण ह्यांबरोबरच आपल्याला वकील, प्राध्यापक, सैनिक सगळेच पाहिजे. त्याचप्रमाणे भूतमात्रात कावळा, चिमणी, सर्प माणसांसकट सर्व प्राणी पक्षी जलचर पाहिजेत. हे सर्व मिळूनच पर्यावरण होते.

पर्यावरण म्हणजे काय? आपण सर्व जण एकमेकांवर अवलंबून आहोत. ही सर्वांनी एकमेकांवर अवलंबून राहण्याची जी व्यवस्था आहे तिलाच पर्यावरण असे म्हणतात. ही एक साखळी आहे. ह्या साखळीतील. एक जरी काडी निखळली तरी त्याचा सगळ्यावर दुरोगामी परिणाम होतो. उदाहरणार्थ गिधाडे आता लुप्त होत चाललेली आहेत. निसर्गात जेव्हा प्राणी जेव्हा मारतो तेव्हा ती घाण, कुजलेल्या अवशेषांना गिधाडे फस्त करतात. मात्र आता गिधाडांची संख्याच कमी झाल्यामुळे ती घाण पडून राहून त्यातून काहीसे रोग निर्माण होतात व हे रोग नंतर सर्वत्र पोहोचतात. हे असे आपण सर्व एकमेकांना जोडलेले आहोत व एकमेकांवर अवलंबून आहोत. केवळ माणसेच नव्हे तर निसर्गाचे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, पण आपल्याला हे कळत नाही.

पर्यावरण राखा असे जे सांगितले जाते, त्याचे कारण हे आहे. पर्यावरण राखणे म्हणजे फक्त वृक्ष जोपासणे असे नव्हे. वृक्ष जोपासणे, वृक्ष संवर्धन हे तर हवेच, पण त्याबरोबर इतर अनेक घटक आहेत. सर्व उपयुक्त आहे म्हणूनच “खल्विदं ब्रह्म” असे म्हटलेले आहे. ब्रह्माचा अर्थ मी वेगळा लावला. जगात जे जे निर्माण झाले आहे ते व ते सर्वच खऱोखर उपयुक्त आहे.
हे मी का सांगतो आहे. धर्म धर्म म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या धर्माची उपासना, जोपासना ही व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात मानवधर्म, म्हणजेच माणसाने माणसासारखे वागावे, राहावे, तसे संबंध एकमेकांशी ठेवावे ह्याचे सचोटीने वर्तनात आणले पाहिजे. जगात जे काही अयोग्य अनिष्ट चालू आहे ते थांबवायचे असेल तर ह्या मानवधर्माचे सर्वांकडून पालन हाच त्यावरचा उपाय.

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

3 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

12 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

34 minutes ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

1 hour ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

1 hour ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

2 hours ago