उपयुक्तता

सद्गुरू वामनराव पै


जगात प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. तो निर्माण झाला याचा अर्थच तो उपयुक्त आहे. सफाई कामगार किती उपयुक्त? उद्या जर ठरवून ते आलेच नाहीत, त्यांनी कचरा नेलाच नाही, तर आपल्याला नाक धरण्याची वेळ येईल. घराबाहेर पडणे गैरसोयीचे होईल. हे कधी? जर सफाई कामगारांनी संप पुकारला तर. कारकुनांनी संप पुकारला तरी तेच, अधिकाऱ्यांनी संप पुकारला तरी तेच. डॉक्टरांनी संप पुकारला तर अवघा Chaos होईल. कारण ह्यांबरोबरच आपल्याला वकील, प्राध्यापक, सैनिक सगळेच पाहिजे. त्याचप्रमाणे भूतमात्रात कावळा, चिमणी, सर्प माणसांसकट सर्व प्राणी पक्षी जलचर पाहिजेत. हे सर्व मिळूनच पर्यावरण होते.


पर्यावरण म्हणजे काय? आपण सर्व जण एकमेकांवर अवलंबून आहोत. ही सर्वांनी एकमेकांवर अवलंबून राहण्याची जी व्यवस्था आहे तिलाच पर्यावरण असे म्हणतात. ही एक साखळी आहे. ह्या साखळीतील. एक जरी काडी निखळली तरी त्याचा सगळ्यावर दुरोगामी परिणाम होतो. उदाहरणार्थ गिधाडे आता लुप्त होत चाललेली आहेत. निसर्गात जेव्हा प्राणी जेव्हा मारतो तेव्हा ती घाण, कुजलेल्या अवशेषांना गिधाडे फस्त करतात. मात्र आता गिधाडांची संख्याच कमी झाल्यामुळे ती घाण पडून राहून त्यातून काहीसे रोग निर्माण होतात व हे रोग नंतर सर्वत्र पोहोचतात. हे असे आपण सर्व एकमेकांना जोडलेले आहोत व एकमेकांवर अवलंबून आहोत. केवळ माणसेच नव्हे तर निसर्गाचे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, पण आपल्याला हे कळत नाही.


पर्यावरण राखा असे जे सांगितले जाते, त्याचे कारण हे आहे. पर्यावरण राखणे म्हणजे फक्त वृक्ष जोपासणे असे नव्हे. वृक्ष जोपासणे, वृक्ष संवर्धन हे तर हवेच, पण त्याबरोबर इतर अनेक घटक आहेत. सर्व उपयुक्त आहे म्हणूनच “खल्विदं ब्रह्म” असे म्हटलेले आहे. ब्रह्माचा अर्थ मी वेगळा लावला. जगात जे जे निर्माण झाले आहे ते व ते सर्वच खऱोखर उपयुक्त आहे.
हे मी का सांगतो आहे. धर्म धर्म म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या धर्माची उपासना, जोपासना ही व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात मानवधर्म, म्हणजेच माणसाने माणसासारखे वागावे, राहावे, तसे संबंध एकमेकांशी ठेवावे ह्याचे सचोटीने वर्तनात आणले पाहिजे. जगात जे काही अयोग्य अनिष्ट चालू आहे ते थांबवायचे असेल तर ह्या मानवधर्माचे सर्वांकडून पालन हाच त्यावरचा उपाय.

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,