ममता सरकारला सर्वोच्च न्यायालयाचाही धक्का

२५,००० शिक्षकांची भरती रद्द करण्याचा निर्णय कायम


कोलकाता : पश्चिम बंगालमधील २५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.


कोलकाता उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये राज्य संचालित आणि राज्य अनुदानित शाळांसाठी एसएससीने केलेली २५,००० हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द केली होती. गुरुवारी निकाल देताना सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही वैध कारण किंवा आधार आम्हाला आढळला नाही.



तीन महिन्यात नव्याने निवड प्रक्रिया राबवा


नियुक्त्या रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार आणि इतर भत्ते परत करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकारने निवड प्रक्रिया नव्याने सुरू करावी. ती तीन महिन्यांत पूर्ण करावी, असेही आदेश देत मानवतावादी दृष्टीकोनातून या निर्णयातून अपंग कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आणि ते नोकरीत कायम राहतील, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. असे सांगण्यात आले.



पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा


पश्चिम बंगाल सरकारने २०१४ मध्ये राज्यस्तरीय निवड चाचणी (एसएलएसटी) द्वारे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली. जुलै २०२२ मध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तत्कालीन शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. चॅटर्जी यांच्या अटकेनंतर, ईडीने चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून सुमारे ५० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने जप्त केले होते. २५,००० शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केली होती.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Thalapathy vijay meets pm narendra modi : CM थलपती विजय यांनी घेतली PM मोदींची भेट! २५ मिनिटांच्या चर्चेने वाढवले राजकीय तापमान!

नवी दिल्ली : तामिळनाडूचे (Tamilnadu Minister) नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय (थलपती विजय) (Vijay Joseph) हे

AMCA stealth fighter : संरक्षण क्षेत्रात क्रांती! भारताच्या पहिल्या स्टेल्थ फायटर 'AMCA' साठी १५,००० कोटींची शर्यत सुरू; ३ बड्या कंपन्या शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद अनेक पटींनी वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) आज एक ऐतिहासिक पाऊल

जलजीवन मिशनच्या ५१ हजार योजनांचा आढावा; नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनमधील योजनांचा दिल्लीत आढावा मुख्यमंत्री देवेंद्र

Keralam : माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चे छापे; केरळमधील थरारक व्हिडिओमुळे देशात खळबळ!

तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीत आज अत्यंत तणावाचे आणि हिंसक वातावरण पाहायला मिळाले. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल