१ मेपासून ‘एक राज्य, एक नोंदणी’

जमीन, मालमत्ता खरेदीची कोणत्याही निबंधक कार्यालयात होणार नोंदणी


मुंबई : आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग १ मे, महाराष्ट्र दिनापासून ‘एक राज्य, एक नोंदणी’ सुरू करणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे.



महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येत नव्हता. एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयामध्ये केली जात आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांचा वेळ आणि पैसे वाया जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ‘एक राज्य, एक नोंदणी’ हा उपक्रम सुरू करत आहे. १७ फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत हा उपक्रम लागू करण्यात आला होता. त्यानंतर १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांतही तो राबविण्यात आला. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण ४८ दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये दस्त नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहून हा उपक्रम राज्यात सुरू केला जात आहे.



डिजिटल स्वाक्षरी असणार अनिवार्य


कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्यास, दस्तऐवजावर विभागाचा अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करील. सुरक्षिततेच्या उपायासाठी, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या पडताळणीद्वारे ओळख अनिवार्य केली जाईल. तसेच, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीने दस्त सादर करणे अनिवार्य करण्यात येईल, अशी माहितीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात