KKR vs SRH 2025: घरच्या मैदानावर कोलकात्याचा मोठा विजय, हैदराबादचा सलग तिसरा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला धावांनी हरवत मोठा विजय मिळवला. या सामन्यात कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २०० धावा केल्या होत्या. मात्र सनरायजर्सला या सामन्यात केवळ १२० धावाच करता आल्या. या सामन्यात कोलकात्याने तब्बल ८० धावांनी विजय मिळवला.


आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पॉवरप्लेमध्ये तीन विकेट गमावले. पहिल्या षटकांत ट्रेविस हेड बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर इशान किशनला बाद करण्यात कोलकात्याला यश आले.


नितीश कुमार रेड्डीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र आंद्रे रसेलने त्याला बाद केले. कामिंदु मेंडिसने २७ धावा करताना चांगले शॉट खेळण्याचे प्रयत्न केले. मात्र सुनील नरेनच्या फिरकीसमोर तो टिकू शकला नाही. अनिकेत वर्माही लवकर बाद झाला.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ बाद २०० धावा केल्या होत्या. कोलकाताची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांनी दुसऱ्याच षटकांत क्विंटन डी कॉकची विकेट गमावली. त्यानंतर सुनील नरेनही बाद झाला. यानंतर अंगकृष रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत केकेआरला सांभाळले. जीशान अन्सारीने रहाणेला बाद करत ही भागीदारी तोडली. रहाणेने ३८ धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर रघुवंशीने ३० बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान रघुवंशी अर्धशतक झाल्यानंतर लगेचच बाद झाला. रघुवंशी बाद झाल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि रिंकु सिंह यांनी ४१ बॉलवर ९१ धावांची तुफान भागीदारी करत कोलकाता नाईट रायडर्सला २००ची धावसंख्या गाठून देण्यात मदत केली.

Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर