Naresh Mhaske : राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम पेन्शनमध्ये किमान २००० रुपयांनी वाढ करा - खा. नरेश म्हस्के

नवी दिल्ली : राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) अंतर्गत देशातील गरीब वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लोकांना मासिक पेन्शनद्वारे आर्थिक मदत प्रदान केली जाते. महागाई वाढत असून मिळणारी रक्कम ही अत्यंत तुटपुंजी आहे. मासिक पेन्शनमध्ये किमान २००० रुपयांनी वाढ करावी, अशी आग्रही मागणी आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम ३७७च्या अधिनियमाखाली सूचनेद्वारे केली.


राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे जी समाजातील गरीब आणि असुरक्षित वर्गांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. वृद्ध, विधवा, अपंग आणि शोकग्रस्त कुटुंबांसाठी किमान जीवनमान सुनिश्चित करणे हे NSAP चे उद्दिष्ट आहे. NSAP ची सुरुवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. या योजने अंतर्गत २०० ते ५०० रुपयांपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते, जी अत्यंत अपुरी असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.



राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम रकमेतील अंतिम वाढ २०१२ मध्ये झाली होती, त्यानंतर आजपर्यंत महागाई अनेक पटींनी वाढली आहे. या दरम्यान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून स्वतंत्रपणे काही अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते, पण ती सर्वत्र समान नाही. या संदर्भात पूर्वी अनेक तज्ञ समित्यांनी जसे की, ग्रामीण विकास मंत्रालयाचा विभागीय अहवाल (२०२१), नीति आयोग (२०२०), सुमित बोस समिती (२०१६) आणि नीति आयोग (२०२०) यांनीही स्पष्टपणे पेन्शन रक्कम वाढवण्याची शिफारस केलेली आहे.


देशातील गरीब, वृद्ध, दिव्यांगजन व अशक्त लोकांच्या जीवनासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सहाय्य रक्कम किमान २००० रुपयांनी प्रति महिना वाढवली जावी तसेच महागाईच्या दरानुसार प्रत्येक वर्षी पेन्शन रकमेतील वाढीची व्यवस्था देखील सुनिश्चित करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर