Naresh Mhaske : राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम पेन्शनमध्ये किमान २००० रुपयांनी वाढ करा - खा. नरेश म्हस्के

  85

नवी दिल्ली : राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) अंतर्गत देशातील गरीब वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लोकांना मासिक पेन्शनद्वारे आर्थिक मदत प्रदान केली जाते. महागाई वाढत असून मिळणारी रक्कम ही अत्यंत तुटपुंजी आहे. मासिक पेन्शनमध्ये किमान २००० रुपयांनी वाढ करावी, अशी आग्रही मागणी आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम ३७७च्या अधिनियमाखाली सूचनेद्वारे केली.


राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे जी समाजातील गरीब आणि असुरक्षित वर्गांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. वृद्ध, विधवा, अपंग आणि शोकग्रस्त कुटुंबांसाठी किमान जीवनमान सुनिश्चित करणे हे NSAP चे उद्दिष्ट आहे. NSAP ची सुरुवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. या योजने अंतर्गत २०० ते ५०० रुपयांपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते, जी अत्यंत अपुरी असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.



राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम रकमेतील अंतिम वाढ २०१२ मध्ये झाली होती, त्यानंतर आजपर्यंत महागाई अनेक पटींनी वाढली आहे. या दरम्यान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून स्वतंत्रपणे काही अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते, पण ती सर्वत्र समान नाही. या संदर्भात पूर्वी अनेक तज्ञ समित्यांनी जसे की, ग्रामीण विकास मंत्रालयाचा विभागीय अहवाल (२०२१), नीति आयोग (२०२०), सुमित बोस समिती (२०१६) आणि नीति आयोग (२०२०) यांनीही स्पष्टपणे पेन्शन रक्कम वाढवण्याची शिफारस केलेली आहे.


देशातील गरीब, वृद्ध, दिव्यांगजन व अशक्त लोकांच्या जीवनासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सहाय्य रक्कम किमान २००० रुपयांनी प्रति महिना वाढवली जावी तसेच महागाईच्या दरानुसार प्रत्येक वर्षी पेन्शन रकमेतील वाढीची व्यवस्था देखील सुनिश्चित करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे