Mhada Lottery : सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! म्हाडाच्या नव्या घरांची निघणार लॉटरी

मुंबई : आपलं हक्काचं घर असावं असे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मात्र सातत्याने वाडत चाललेल्या घरांच्या किंमतीमुळे लोक म्हाडा आणि सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशाच लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून नव्या घरांची लॉटरी निघणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Mhada Lottery)


म्हाडाचे सीईओ संजीव जैयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये घरांच्या गरजा मोठ्या आहेत. परवडणारे घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडाचा मोठा वाटा असतो. गेल्या वर्षभरात एक ते दोन लॉटरी काढल्या आहेत. त्यानंतर यंदा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत ३ ते ४ हजार घरांची लॉटरी काढणार असल्याचे सांगितले आहे.



म्हाडाच्या घराच्या किंमती होणार कमी 


म्हाडा घराच्या किंमती इतर घरांपेक्षा कमी असल्यातरीही अनेक सर्वसामान्य लोकांच्या खिशाला दर परवडत नाहीत. त्यामुळे म्हाडाने याबाबत शासनाला लेखी स्वरुपात प्रस्ताव पाठवला आहे. जर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे संजीव जैयस्वाल यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले. (Mhada Lottery)


त्याचबरोबर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे त्यांनी म्हटले. दुर्बल घटकांसाठी ओव्हरडेड चार्जेस कमी केले तर घराच्या ३५ टक्के कमी होऊ शकते.


दरम्यान, मुंबईच्या जमिनीच्या किंमती खूप जास्त आहे. या किंमती कोणत्याही शहराशी २५ टक्के ते १० टक्के घट केली आहे. याच्यापुढे ही घट होणे शक्य नाही. परंतु जर ओव्हरहेड चार्जेस कमी झाले तर कदाचित किंमती कमी होऊ शकतात. आता अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी घराच्या किंमती ५० लाखांच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न आहे.शासनाचे इन्फ्रास्टक्चर आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Mhada Lottery)

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद