Mhada Lottery : सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! म्हाडाच्या नव्या घरांची निघणार लॉटरी

मुंबई : आपलं हक्काचं घर असावं असे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मात्र सातत्याने वाडत चाललेल्या घरांच्या किंमतीमुळे लोक म्हाडा आणि सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशाच लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून नव्या घरांची लॉटरी निघणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Mhada Lottery)


म्हाडाचे सीईओ संजीव जैयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये घरांच्या गरजा मोठ्या आहेत. परवडणारे घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडाचा मोठा वाटा असतो. गेल्या वर्षभरात एक ते दोन लॉटरी काढल्या आहेत. त्यानंतर यंदा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत ३ ते ४ हजार घरांची लॉटरी काढणार असल्याचे सांगितले आहे.



म्हाडाच्या घराच्या किंमती होणार कमी 


म्हाडा घराच्या किंमती इतर घरांपेक्षा कमी असल्यातरीही अनेक सर्वसामान्य लोकांच्या खिशाला दर परवडत नाहीत. त्यामुळे म्हाडाने याबाबत शासनाला लेखी स्वरुपात प्रस्ताव पाठवला आहे. जर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे संजीव जैयस्वाल यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले. (Mhada Lottery)


त्याचबरोबर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे त्यांनी म्हटले. दुर्बल घटकांसाठी ओव्हरडेड चार्जेस कमी केले तर घराच्या ३५ टक्के कमी होऊ शकते.


दरम्यान, मुंबईच्या जमिनीच्या किंमती खूप जास्त आहे. या किंमती कोणत्याही शहराशी २५ टक्के ते १० टक्के घट केली आहे. याच्यापुढे ही घट होणे शक्य नाही. परंतु जर ओव्हरहेड चार्जेस कमी झाले तर कदाचित किंमती कमी होऊ शकतात. आता अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी घराच्या किंमती ५० लाखांच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न आहे.शासनाचे इन्फ्रास्टक्चर आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Mhada Lottery)

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे