Mhada Lottery : सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! म्हाडाच्या नव्या घरांची निघणार लॉटरी

  87

मुंबई : आपलं हक्काचं घर असावं असे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मात्र सातत्याने वाडत चाललेल्या घरांच्या किंमतीमुळे लोक म्हाडा आणि सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशाच लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून नव्या घरांची लॉटरी निघणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Mhada Lottery)


म्हाडाचे सीईओ संजीव जैयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये घरांच्या गरजा मोठ्या आहेत. परवडणारे घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडाचा मोठा वाटा असतो. गेल्या वर्षभरात एक ते दोन लॉटरी काढल्या आहेत. त्यानंतर यंदा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत ३ ते ४ हजार घरांची लॉटरी काढणार असल्याचे सांगितले आहे.



म्हाडाच्या घराच्या किंमती होणार कमी 


म्हाडा घराच्या किंमती इतर घरांपेक्षा कमी असल्यातरीही अनेक सर्वसामान्य लोकांच्या खिशाला दर परवडत नाहीत. त्यामुळे म्हाडाने याबाबत शासनाला लेखी स्वरुपात प्रस्ताव पाठवला आहे. जर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे संजीव जैयस्वाल यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले. (Mhada Lottery)


त्याचबरोबर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे त्यांनी म्हटले. दुर्बल घटकांसाठी ओव्हरडेड चार्जेस कमी केले तर घराच्या ३५ टक्के कमी होऊ शकते.


दरम्यान, मुंबईच्या जमिनीच्या किंमती खूप जास्त आहे. या किंमती कोणत्याही शहराशी २५ टक्के ते १० टक्के घट केली आहे. याच्यापुढे ही घट होणे शक्य नाही. परंतु जर ओव्हरहेड चार्जेस कमी झाले तर कदाचित किंमती कमी होऊ शकतात. आता अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी घराच्या किंमती ५० लाखांच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न आहे.शासनाचे इन्फ्रास्टक्चर आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Mhada Lottery)

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत