Central Railway : मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ!

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. दौंड - अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष गाडी दौंड ते अजमेर विशेष, गाडी १० एप्रिलपासून २६ जूनपर्यंत धावेल. अजमेर ते दौंड विशेष ही २८ मार्चपर्यंत चालवण्यात येणार होती ती आता ११ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल.



सोलापूर - अजमेर - सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत धावणार आहे. अजमेर ते सोलापूर विशेष गाडी ६ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावेल. साई नगर शिर्डी - बीकानेर - साई नगर साप्ताहिक शिर्डी विशेष गाडी १३ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत धावेल. बीकानेर ते साई नगर शिर्डी विशेष, १२ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावेल. दादर - भुसावळ - दादर विशेष - गाडी आता ३० जूनपर्यंत धावेल. भुसावळ ते दादर विशेष,गाडी आता ४ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल. दादर ते भुसावळ विशेष गाडी ४ मेपासून २७ जूनपर्यंत धावेल.


पुढील अनारक्षित विशेष रेल्वे सेवांचा विस्तार ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे.




  • गाडी क्रमांक ०७३०१ बेळगावि ते मिरज

  • गाडी क्रमांक ०७३०२ मिरज ते बेळगावी

  • गाडी क्रमांक ०७३०३ बेळगावी ते मिरज

  • गाडी क्रमांक ०७३०४ मिरज ते बेळगावी


या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी