Central Railway : मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ!

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. दौंड - अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष गाडी दौंड ते अजमेर विशेष, गाडी १० एप्रिलपासून २६ जूनपर्यंत धावेल. अजमेर ते दौंड विशेष ही २८ मार्चपर्यंत चालवण्यात येणार होती ती आता ११ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल.



सोलापूर - अजमेर - सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत धावणार आहे. अजमेर ते सोलापूर विशेष गाडी ६ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावेल. साई नगर शिर्डी - बीकानेर - साई नगर साप्ताहिक शिर्डी विशेष गाडी १३ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत धावेल. बीकानेर ते साई नगर शिर्डी विशेष, १२ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावेल. दादर - भुसावळ - दादर विशेष - गाडी आता ३० जूनपर्यंत धावेल. भुसावळ ते दादर विशेष,गाडी आता ४ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल. दादर ते भुसावळ विशेष गाडी ४ मेपासून २७ जूनपर्यंत धावेल.


पुढील अनारक्षित विशेष रेल्वे सेवांचा विस्तार ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे.




  • गाडी क्रमांक ०७३०१ बेळगावि ते मिरज

  • गाडी क्रमांक ०७३०२ मिरज ते बेळगावी

  • गाडी क्रमांक ०७३०३ बेळगावी ते मिरज

  • गाडी क्रमांक ०७३०४ मिरज ते बेळगावी


या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार