मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. दौंड – अजमेर – दौंड साप्ताहिक विशेष गाडी दौंड ते अजमेर विशेष, गाडी १० एप्रिलपासून २६ जूनपर्यंत धावेल. अजमेर ते दौंड विशेष ही २८ मार्चपर्यंत चालवण्यात येणार होती ती आता ११ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल.
सोलापूर – अजमेर – सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत धावणार आहे. अजमेर ते सोलापूर विशेष गाडी ६ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावेल. साई नगर शिर्डी – बीकानेर – साई नगर साप्ताहिक शिर्डी विशेष गाडी १३ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत धावेल. बीकानेर ते साई नगर शिर्डी विशेष, १२ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावेल. दादर – भुसावळ – दादर विशेष – गाडी आता ३० जूनपर्यंत धावेल. भुसावळ ते दादर विशेष,गाडी आता ४ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल. दादर ते भुसावळ विशेष गाडी ४ मेपासून २७ जूनपर्यंत धावेल.
पुढील अनारक्षित विशेष रेल्वे सेवांचा विस्तार ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे.
या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…