Kunal Kamra : कुणाल कामराला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स

तामिळनाडूच्या कोर्टाने मंजूर केला अटकपूर्व ट्रांझिट जामिन


मुंबई : वादग्रस्त विनोदवीर कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी तिसरे समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून कुणाल तामिळनाडूला निघून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुंबईच्या घरी नोटीस बजावली आहे. दरम्यान तामिळनाडूच्या वानूर येथील कोर्टाने कामराला अटकपूर्व ट्रांझिट बेल मंजूर केली आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला तिसरे समन्स बजावले. या प्रकरणी खार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला समन्स बजावत ५ एप्रिलपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. पण, तो एकदाही उपस्थित राहिलेला नाही.



कुणाल कामरा याला तामिळनाडूच्या वानूर येथील न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मंजूर केला. यापूर्वी मद्रास हायकोर्टाने कुणाल याला ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामरा यांला औपचारिकपणे जामीन मिळवण्यासाठी वानूर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर, वानूर न्यायालयातून त्याला पुन्हा दिलासा मिळाला आहे. दम्यान कुणाल कामराने आणखी एक नवीन पोस्ट करत सरकारवर दडपशाहीचा आरोप केला आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी