Kunal Kamra : कुणाल कामराला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स

तामिळनाडूच्या कोर्टाने मंजूर केला अटकपूर्व ट्रांझिट जामिन


मुंबई : वादग्रस्त विनोदवीर कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी तिसरे समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून कुणाल तामिळनाडूला निघून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुंबईच्या घरी नोटीस बजावली आहे. दरम्यान तामिळनाडूच्या वानूर येथील कोर्टाने कामराला अटकपूर्व ट्रांझिट बेल मंजूर केली आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला तिसरे समन्स बजावले. या प्रकरणी खार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला समन्स बजावत ५ एप्रिलपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. पण, तो एकदाही उपस्थित राहिलेला नाही.



कुणाल कामरा याला तामिळनाडूच्या वानूर येथील न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मंजूर केला. यापूर्वी मद्रास हायकोर्टाने कुणाल याला ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामरा यांला औपचारिकपणे जामीन मिळवण्यासाठी वानूर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर, वानूर न्यायालयातून त्याला पुन्हा दिलासा मिळाला आहे. दम्यान कुणाल कामराने आणखी एक नवीन पोस्ट करत सरकारवर दडपशाहीचा आरोप केला आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे