Lalu Prasad Yadav Health Update : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली!

बिहार:  : राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आज (दि २) एअर एम्बुलन्सने उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आले.



लालूंच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना जुन्या जखमांचा त्रास उमाळून आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत लालू प्रसाद यादव यांच्यावर ३ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्यावर १३ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या छातीत स्टेंट बसवण्यात आला आहे. यापूर्वी २०२२२ मध्ये त्यांचे सिंगापूरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. त्यांना मुलगी रोहिणी हिने किडनी दान केली होती. त्याच वर्षी, त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घरी ते अपघाताने पडले, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. त्यानंतर, त्यांच्यावर पाटण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने, त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.


तर २०१४ मध्ये लालूंवर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतानाही दिसले. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर, अनेक बाबतीत खबरदारी घ्यावी लागते. किडनीच्या आजाराव्यतिरिक्त, लालू इतर अनेक आजारांनी देखील ग्रस्त आहेत.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत