ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारतात उत्पादन, गुंतवणूक, नवकल्पना आणि ऊर्जा क्षेत्राचा व्यापक विस्तार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत, “विकासासाठी विद्युतीकरण आणि शाश्वततेसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत,” असे नमूद केले.


इंडियन इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ मध्ये गुरुवारी केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी वाचून दाखवलेल्या लिखित संदेशात पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा प्रवासातील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट संपूर्ण ऊर्जा परिसंस्थेला एका मंचावर आणून विचारांची देवाणघेवाण करणे आणि ऊर्जा विकासासाठी सामूहिक मार्ग निश्चित करणे आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात असून सर्वांसाठी विश्वासार्ह ऊर्जा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.


नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून २०३० पर्यंत ५०० गीगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक गैर-जीवाश्म इंधन क्षमता आधीच साध्य करण्यात आली आहे.


“एक सूर्य, एक जग, एक ग्रिड” यांसारख्या उपक्रमांद्वारे जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत मजबूत पुरवठा साखळी निर्माण करत विश्वासार्ह ऊर्जा भागीदार म्हणून उदयास येत आहे. बॅटरी उत्पादन, रोजगारनिर्मिती आणि सुधारित धोरणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळत आहे.


तसेच, ‘शांती अधिनियम २०२५’मुळे अणुऊर्जा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत असून ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’मुळे वितरित ऊर्जा उत्पादन आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.

Dhurandhar Production Designer : बॉलिवूडमध्ये खळबळ! नागपूरच्या तरुणीला 'हॉटेलमध्ये बोलावले अन्...; ब्लॉकबस्टर 'धुरंधर' फेम जॉन जोसेफविरोधात बलात्काराची तक्रार

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या 'धुरंधर' (Dhurandar)

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी; महायुतीला विकासाची नवी ऊर्जा

मुंबई : " प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाच्या यशस्वी नेतृत्वामुळे भारताच्या अमृतकाळाची नवी पर्वणी