होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (Rakesh Ranjan Singh) यांचे निधन झाले आहे. २८ फेब्रुवारीपासून जहाज समुद्रात अडकले होते आणि तब्बल १८ दिवस तेथेच थांबावे लागले.


मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिंह यांचे कुटुंब सध्या रांची येथे राहते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.


माहितीनुसार, १८ मार्च रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी दुबई एटीसीकडे एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी मिळू शकली नाही. त्यानंतर बोटीने किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.


‘अवाना’ जहाजावर कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी अडकले होते. या काळात त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाहीत, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Gujarat Tragedy : वडोदरा-हालोल महामार्गावर उभ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, तर २६ प्रवासी जखमी

वडोदरा : गुजरात राज्याला (Gujrat News) हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना बुधवारी पहाटे घडली

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 जूनपूर्वी 'ही' गोष्ट पूर्ण करा

अन्यथा सबसिडी मिळण्यात अडचण

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death)

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी