Buldhana News : बुलढाण्यात तीन गाड्यांच्या भीषण अपघातात पाच ठार, २४ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.


प्राथमिक माहितीनुसार, आज, बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. जयपुर लांडे फाट्या समोर हा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच २४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.



अधिक माहिती अशी की, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी पुण्याकडून परतवाडाकडे एक एसटी महामंडळाची बस जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे.


दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर चानेज ३२० जवळील एका पुलावर लोखंडी रॉडचा तुकडा तुटून महामार्गावर आल्याने रात्रीच्या वेळेस जवळपास आठ वाहनांची टायर फूटली आहेत. हा लोखंडी तुकडा तुटून पुलाच्या वर आल्याने यावर भरधाव वाहने धडकल्याने अनेक वाहनांची समोरची दोन्ही टायर फुटल्याने रात्रीच्या वेळेस वाहनधारक रस्त्यात अडकून पडले होते. समृद्धी महामार्ग प्रशासन व नियंत्रण कक्षाला या अडकलेल्या वाहनधारकांनी फोन केल्यावरही जवळपास तासभर वाहनधारकांना मदत मिळाली नाही.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये