Buldhana News : बुलढाण्यात तीन गाड्यांच्या भीषण अपघातात पाच ठार, २४ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.


प्राथमिक माहितीनुसार, आज, बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. जयपुर लांडे फाट्या समोर हा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच २४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.



अधिक माहिती अशी की, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी पुण्याकडून परतवाडाकडे एक एसटी महामंडळाची बस जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे.


दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर चानेज ३२० जवळील एका पुलावर लोखंडी रॉडचा तुकडा तुटून महामार्गावर आल्याने रात्रीच्या वेळेस जवळपास आठ वाहनांची टायर फूटली आहेत. हा लोखंडी तुकडा तुटून पुलाच्या वर आल्याने यावर भरधाव वाहने धडकल्याने अनेक वाहनांची समोरची दोन्ही टायर फुटल्याने रात्रीच्या वेळेस वाहनधारक रस्त्यात अडकून पडले होते. समृद्धी महामार्ग प्रशासन व नियंत्रण कक्षाला या अडकलेल्या वाहनधारकांनी फोन केल्यावरही जवळपास तासभर वाहनधारकांना मदत मिळाली नाही.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद